×

भिडे-एकबोटेने दंगलीचे षड्यंत्र आखल्याचे पुराव्यानिशी कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर आलेय

Published On :    9 Jun 2023
साझा करें:

देवेंद्र फडणवीस यांनी साक्षीदार म्हणून पुढे यावे ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या मागणीला ऍड. राहुल मखरे यांचा पाठिंबा, आयोग गुंडाळण्याचीही भीती, दंगलीची जबाबदारी निश्‍चित होईल



मुंबई: भिडे-एकबोटेने दंगलीचे षड्यंत्र आखल्याचे पुराव्यानिशी कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर आले आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी साक्षीदार म्हणून पुढे यावे अशाप्रकारची मागणी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्या मागणीला ऍड. राहुल मखरे यांनी पाठिंबा दिला असून आयोग गुंडाळण्याचीही भीती असली तरी या दंगलीची जबाबदारी निश्‍चित होईल असे त्यांनी सांगितले. एमएनन्यूज महाराष्ट्रचे पत्रकार संकेत कांबळे यांनी ऍड. मखरे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.


चार दिवसांच्या हायलाईटस काय आहेत? या प्रश्‍नावर ऍड. राहुल मखरे म्हणाले, मी क्लिअर करू इच्छितो की मागच्या चार-पाच वर्षात जे कामकाज केले ते एकट्याने नाही. त्यामध्ये ऍड.चन्ने व ऍड. बनसोडे आहेत. सिनिअर ऍड. देसाई आहेत. बाकीचे अन्य ज्युनिअर ऍडव्होकेटही आहेत. मी एकटाच काम करत नाही. नाही माझ्या म्हणण्याचा उद्देश होता की, तुम्ही सुरूवातीपासून आहात असे कांबळे म्हणाले.


या चार दिवसांच्या हायलाईटसबाबत बोलताना ऍड. मखरे म्हणाले, सोमवार-मंगळवार ऍड. चन्ने यांनी उलट तपासणी घेतली होती. कालच्या आणि आजच्या उलटतपासणीत ही गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट झाली आहे, जो मॉब १ जानेवारी, २०१८ ला आक्रमक घोषणाबाजी करत वढू बुद्रूककडून निघाला, तोच मॉब कोरेगाव-भीमामध्ये आला आणि तोच पेरणे फाटा व कोरेगाव-भीमाच्या दरम्यान असलेल्या ब्रीजवर आला. त्या नदीवर मॉबला अडवण्यात आले, त्या मॉबला अडवण्यात आले नसते तर मोठी काहीतरी घटना-हिंसा घडली असती. ही गोष्ट आज आयोगासमोर पहिल्यांदा स्पष्ट झाली आहे. पीआय गलांडे यांना या गोष्टी मी घेतलेल्या उलट तपासामध्ये त्यांना सांगाव्या लागल्या. 


जी काही पुणे सिटीची थेअरी होती, त्या थेअरीला काऊंटर करायला हवे व ही थेअरी खोडून काढली पाहिजे, परंतु आज आमच्यासमोर व आयोगासमोर ज्या गोष्टी आलेल्या आहेत, किंवा आम्हांला ज्या दिसत आहेत, वढू ब्रुदूककडून निघालेला मॉब कोरेगाव-भीमामध्ये आला, तोच मॉब पेरणे फाट्यावरील ब्रीज ओलांडून चालला होता. मुद्दा असा आहे की, हा मॉब ब्रीज ओलांडून का जात होता? या गोष्टी आल्या आहेत. 


आणखी एक दुसरी महत्वाची घटना आहे की, सरकार जरा आमच्यावर खूपच नाराज आहे. सरकारी वकील खूपच नाराज आहेत. त्यांनी आज बोलता-बोलता तुमची आम्हांला काळजी वाटते असे विधान केले. त्यानंतर असेही विधान केले की, रस्त्यावर काहीही होऊ शकते. ही दोन्ही विधाने एकत्र केली तर सरकारला माझ्याबद्दल जास्त काळजी वाटते. सरकारने अनेक प्रयत्न केले, आणखीनही सरकार प्रयत्न करेल. सरकारच्या अखत्यारित जेवढ्या सिस्टम-मशीनरी आहेत, संस्था आहेत, त्या आधारे माझी काळजी करण्याचा सरकार प्रयत्न करेल. त्या काळजीला मी पुरून उरेन एवढेच मी तुम्हांला सांगतो.


हा खूप गंभीर मुद्दा आहे. गेल्यावेळी आपण इंटरव्ह्यू केला, मुलीसंदर्भात तुम्ही सांगितलेत, पाळत ठेवली जात आहे. रेकी केली जात आहे काय सांगाल? त्यावर ऍड. मखरे म्हणाले, त्यामध्ये ज्या मुलाने त्या गोष्टी केल्या त्या मुलाचे वडील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच आहेत. माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याशी त्या मुलाचे व त्यांच्या कुटूंबाचे घरगुती संबंध आहेत. आता यापेक्षा या विषयावर मी जास्त बोलणार नाही.


गेल्यावेळी तुम्ही संशय घेतला होता, की यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक असू शकतात, ही माहिती आता तुम्ही स्वत: मिळवलीत की त्याची तक्रार केलीत, तक्रारीवर चौकशी झाल्यावर ही माहिती हाती आली का? यावर ऍड. मखरे म्हणाले, ही माहिती पोलिसांना मिळाली असेल. कारण त्यांच्याकडे तेवढी मशीनरी आहे. ही माहिती त्या गावातल्या व तालुक्यातील कार्यकर्त्याने मला दिली. सोशल मीडियावरील स्क्रीन शॉट काढून त्या मला त्यांनी पाठवल्या. त्याचे कुटूंंब व त्याचे वडील भाजपाचे कसे कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये माझा आता काहीच संशय राहिलेला नाही.


 या केसमधून तुम्ही अलिप्त रहावे यासाठी आरएसएस-भाजपाचे लोक धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत का? यावर ऍड. मखरे म्हणाले, तो इन्फरन्स मी काढणार नाही. मात्र अप्रत्यक्षरित्या धमकावले जात आहे. आणखी मी काही त्यांचे घोडे मारलेय, माझ्याकडे बघण्याचा त्यांचा वेगळा दृष्टीकोन का आहे? किंवा मी त्यांच्याबाबत काय पाप केलेय. काही कारणे असूदे ते त्यांना माहित असतील. परंतु प्रथमदर्शनी याच कारणामुळे ते तसे करत आहेत.


कालपरवा ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर म्हणून ज्यांना सर्व लोक ओळखतात, त्यांचे एक स्टेटमेंट आले आहे, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील साक्ष झाली पाहिजे, काय म्हणाल? याला उत्तर देताना ऍड. मखरे म्हणाले, १०० टक्के झाली पाहिजे. मी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकराचा याबाबत समर्थन करतो. त्यांची साक्ष झालीच पाहिजे. 


त्यांनी तीन मागण्या केल्या होत्या. तीन लोकांना साक्षीसाठी बोलावले आहे. एक एसपी सुवेझ हक, दुसरे तत्कालीन मुख्य सचिव व आयोगाचे सदस्य सुमित मलिक आणि तिसरे फडणवीस. फडणवीस यांनी आलेच पाहिजे. त्यांनी उत्तर दिले पाहिजे. ते जबाबदार आहेत. शासनाच्यावतीने उत्तर देण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून. त्यांनी आलेच पाहिजे. याबाबत प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकराच्या भूमिकेशी मी १०० टक्के सहमत आहे. सुवेझ हक येणारच आहेत, ते आलेच आहेत साक्षीला. फक्त त्यांची उलट तपासणी वेळेअभावी घेता आलेली नाही. बाकी फडणवीसांनी आले पाहिजे. जर ते खरोखरच त्याकाळात जबाबदार मुख्यमंत्री व गृहमंत्री होते असे त्यांना सिद्ध करायचे असेल तर त्यांनी हिंमत ठेवून आयोगासमोर गेले पाहिजे. आमच्यासमोर उभे राहिले पाहिजे साक्षीदार म्हणून.


एक शेवटचा प्रश्‍न नेहमीप्रमाणे, मी गेल्यावेळी तो विचारला होता, आणखी किती दिवस-किती महिने याचे कामकाज चालेल? या प्रश्‍नावर ऍड. मखरे म्हणाले, मागचा महिना उन्हाळ्याच्या सुट्टीचा होता. त्यामध्ये तो महिना गेला. याच महिन्यात कामकाज संपले असते. मला खात्री असून थोडे राहिलेले कामकाज आहे. सुट्टीमध्ये अनेक कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. पुरवणीचे कामकाजही होत नाही. आम्हीदेखील सुट्टीचा आनंद घेत असतो. 


बर्‍याच वकीलांना महिना-दीड महिना सुट्टी असते, ती सुट्टी ते घेतात. कर्मचार्‍यांचा प्रश्‍न आहे. त्याचबरोबर आणखी एक समस्या आली आहे, की आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांना सरकारने एक्टंक्शन दिलेले नाही असे समजते. मला असेही वाटते ज्या गोष्टी आयोगासमोर येत आहेत, आलेल्या आहेत आणि येणार आहेत. या आधारे मला असे वाटते की सरकारच्या मनात एक भीती निर्माण झाली असेल आणि फडणवीस हा आयोग गुंडाळतील. 

 

आतापर्यंत जे आलेले आहे, समजा उद्या जरी हा आयोग गुंडाळला तरीही जबाबदारी निश्‍चित होऊ शकतेे का? की पुरावे-गोष्टी इतक्या आयोगासमोर आल्या आहेत का? या प्रश्‍नाला उत्तर देताना ऍड. मखरे म्हणाले, १०० टक्के तेवढ्या गोष्टी आयोगासमोर आलेल्या आहेत. संदर्भ पोलिस आणि मॉबचा आहे. मॉबच्या मागे जे लोक आहेत, त्याबाबत भिडे-एकबोटेंचे षड्यंत्र आहे या गोष्टी सार्‍या आलेल्या आहेत आयोगासमोर. त्या गोष्टी एसपीपीओ गणेश मोरे यांनी सांगितल्या आहेत. जबाबदारी निश्‍चित होईल इतके पुरावे आयोगासमोर आले आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीचेे 2 प्लांट बंद कर
शिरूर तालुक्यातील जांबूत येथील घरकूल घोटाळा प्रकरणी बह
भारत देशात बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, नाहीतर निवडणूक आ
आरएसएस या आतंकवादी संघटनेचा प्रमुख विदेशी ब्राम्हण मोह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper