×

मनुस्मृती लागू होताच कामगार आंदोलने शांत झालीत का?

Published On :    19 Mar 2023  By : MN Staff
शेयर करा:


भारतीय संविधानाने दिलेले कामगार कायदे बदल करून मनुवादी मनुस्मृती उद्योजक धार्जिणे ४ कायदे बनवले.त्यामुळेच राष्ट्रीय बारा ट्रेड युनियनचे कामगार आंदोलन करून शांत झाले आणि हळूहळू खाजगीकरण सुरू झाले. कामगार आंदोलन करून शांत का झाला?





भारतीय संविधानाने दिलेले कामगार कायदे बदल करून मनुवादी मनुस्मृती उद्योजक धार्जिणे ४ कायदे बनवले.त्यामुळेच राष्ट्रीय बारा ट्रेड युनियनचे कामगार आंदोलन करून शांत झाले आणि हळूहळू खाजगीकरण सुरू झाले. कामगार आंदोलन करून शांत का झाला? 


कारण कामगार व कामगारांच्या संघटना, युनियनचे नेतृत्व करणारे कट्टरपंथीय मनुवादी असल्यामुळे तिव्र आंदोलने झाली नाहीत. हे सत्य आता उघड झाले. केंद्रातून सुरूवात झाल्यामुळे आता तर प्रत्येक राज्यशासनाच्या विविध विभागात खाजगीकरण होणार आहे. कामगार आंदोलन करून शांत होणार, युनियन ही थोडे दिवस विरोध करून औद्योगिक कोर्टात जाणार व निकाल येईपर्यंत शांत होणार कामगारांच्या हिताचा विचार करणार्‍या युनियन आता मुकाट्याने सहन का करत आहे? 


या मागे त्यांचे अंतिम ध्येय उदिष्ट हिंदुराष्ट्र आहे. हे कामगार विसरला असेल. पण नेतृत्व विसरले नाही. म्हणूनच सर्व घडामोडी घडत आहेत आणि सगळीकडे शांत शांत आहे. शेतकरी,अंगणवाडी सेविका,सर्व क्षेत्रातील असंघटीत कंत्राटी कामगार यांची आंदोलने होतात.पण ही आंदोलने कोणाच्या नेतृत्वाखाली होतात.ज्यांनी संघटीत कामगारांचे नेतृत्व केले त्यांनी असंघटीत कंत्राटी कामगार आणि मानधनावर काम करणारे कर्मचारी निर्माण केले त्यांच्या नेतृत्वाखाली? म्हणजेच त्यांना हेच दाखवायचे असते की आम्ही तुमच्यासाठी लक्षवेधी आंदोलने करतो.आणि दुसरीकडे मनुस्मृती लागू होताच संघटीत कामगार आंदोलने शांत झाले.


राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, नारायण मेघाजी लोखंडे यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून कामगार चळवळीला एक नवीन दिशा देण्याचे काम केले होते. भारत इंग्रजाच्या पारतंत्र्यात होता.तेव्हा देखील कामगार गुलामा सारखा राबत होता.तेव्हा रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंग्रजांकडे कामगारांच्या हितासाठी अनेक निर्णय ठराव त्या ठिकाणी संघर्ष करून त्यांनी मंजूर करून घेतले होते. 


रविवारची सुट्टी ही सुद्धा त्याच काळात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संघर्षाच्या माध्यमातून मिळाली आहे.आज आपल्या भारतातील जनतेला कामगाराला कष्टकर्‍यांना मजूरांना मिळालेली आहे हे सर्व राष्ट्रीय ट्रेड युनियनवाले विसरतात. तद्नंतर भारताला तथाकथित स्वतंत्र मिळाल्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळात विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताचे प्रथम कायदेमंत्री मजूरमंत्री असताना त्यांनी देखील या देशातील तमाम गरीब कष्टकरी मजूर यांच्या हिताचे कायदे बनवून आणि ते संविधानामध्ये मांडून त्या कायद्याचं सर्व कामगार कष्टकर्‍यांना सुरक्षा कवच निर्माण करून दिले होते. 


कालपर्यंत त्याचा फायदा आपल्याला कामगारांनी कर्मचार्‍यांनी ७० वर्षापर्यंत घेतला आहे. ह्यापुढे ही घेणार की नाही हे त्यांच्या हाती आहे. मनुवादी विचारांच्या बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन ते होऊ देणार नाहीत.त्यासाठी आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी युनियनच्या स्वतंत्र मजदूर युनियन सोबत कामगार,कर्मचारी संघटीत होऊन लढलो तर!


पूर्वीच्या काळामध्ये कामगारांना कष्टकर्‍यांना कोणत्याही सुख सुविधा नसताना देखील ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अन्नपाण्याविना हजारोमैल आंदोलनाला पायी जाऊन त्या ठिकाणी बसत असत आणि असे असताना देखील त्या ठिकाणी त्या लढाया जिंकल्या होत्या. परंतु आज ७० वर्षानंतर त्याच कायद्याच्या माध्यमातून मिळालेल्या सर्व सुख सुविधांचा उपभोग घेऊन सुद्धा आजचा कामगार कष्टकरी हा आंदोलनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे. 


आंदोलनाला आपली गरज नाही असं समजून हे काही लोकांचेच विषय आहेत म्हणून पुढे येत नाही किंवा बोलत नाहीत. परंतु प्रत्येक कामगार हा कोणत्याही जाती,धर्माचा,प्रांताचा आणि वर्गाचा असो,तो कामगार कोण आहेत कामगारांची लढाई आपलीच लढाई आहे असे समजून त्यांनी त्या लढाईत आले पाहिजे सरकारला धारेवर धरले पाहिजे. 


प्रशासनाकडून त्या सगळ्या मागण्या पदरात पाडून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी कामगार विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन संघटित झाला पाहिजे. कामगारांच्या हितासाठी काम करणार्‍या युनियन यांनी हे कार्य नेटाने केलेले पुढे नेले पाहिजे.


कोणत्याही प्रकारची माघार त्यांनी न घेता त्या लढ्याला यश मिळवून दिले पाहिजे आज भारत देशामध्ये आपण पाहिलं तर जवळपास १२ राष्ट्रीय अशा ट्रेड युनियन आहेत त्या युनियन कामगारांचे प्रश्‍न केंद्रामध्ये मांडू शकतात. परंतु त्या सुद्धा केंद्रामध्ये प्रश्‍न व्यवस्थितपणे मांडताना दिसत नाहीत. अनेक वेळा कचखाऊ भूमिका त्या योग्य ठिकाणी घेतांना उघड दिसतात. कारण काय आहे? 


मनुवादी हिंदुत्व हे सांगता येत नाही, मात्र एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास येते की नुकसान हे सर्वात जास्त देशातील बहुजन समाजातील कामगार कर्मचारी लोकांचेच होत आहे आणि मग ते बहुजन समाजाच्या लोकांचे निर्णय घेण्यासाठी जर बहुजन समाजाच्या लोकांची युनियन जी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपत्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारांची युनियन काम करत असेल, तर अशा युनियनच्या पाठीशी सर्व बहुजन समाजातील कामगारांनी उभे राहिले पाहिजे तरच आपण हे जुलमी कायदे या देशातून हद्दपार करू शकतो. 


त्यामुळे शासनकर्ती जमात बनून शासन यंत्रणेवर दबाव निर्माण करू शकतो. या बळावर आज केंद्रात आरएसएस प्रणित भारतीय मजदूर संघांच्या मध्यमातून शासन यंत्रणेवर पूर्णपणे वर्चस्व निर्माण झाले आहे. म्हणजेच मनुस्मृती लागू होताच कामगार आंदोलने शांत झाली का? हा प्रश्‍न उभा राहतो.

रणधीर आल्हाट
९७८२९८७८१९



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बेंबी तट्ट फुगली तरी विदेशी भटा-ब्राम्हणांसाठी मध्य प्र
खोकला, तापावरील १४ औषधांवर सरकारची बंदी!
बालासोर रेल्वे अपघाताच्या ठिकाणी ‘कवच’ संरक्षण यंत्रणा
आता कोल इंडियावर खासगीकरणाची आफत
जे जे रूग्णालयातील ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे
ईव्हीएम घोटाळ्यावरील चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी कें
भाजपा ईव्हीएम मॅनेज करते
‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘द केरला स्टोरी’ संघाचा सरळ अजे
चिंताजनक: राज्यात २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य, ६० हजार श
वृत्तपत्रात जाहीरात न देण्यासाठी राजकीय पक्षांवर बडगा
महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, तीन महिन्यात
बीएमपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेन्द्र प्रताप सिंग यांच
पाटणा उच्च न्यायालयाची जातनिहाय सर्वेक्षणाला स्थगिती
उद्धव ठाकरे शेंडी-जानव्याचा उल्लेख करत असल्याने अल्पसं
छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण!
आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा, पांढरपेशे असा उल्ल
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या भारत बंदने शासक वर्गाच
केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारविरोधात राष्ट्रीय पिछडा व
बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत
ब्राम्हणांना महात्मा फुले यांच्या नावाची भीती का वाटते?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper