अशा प्रकारामुळे सरकारचीच जातीय मानसिकता दिसत आहे. ज्या सरकारने जाती निर्मूलनासाठी काम करायला हवे, तेच सरकार जातीयतेला खतपाणी घालत असेल तर काय म्हणाल?
खतखरेदीसारख्या अत्यंत साध्या व्यवहारात शेतकर्यांवर ‘जातसक्ती’ करण्यात आली आहे. खतखरेदीसाठी असलेल्या ‘ई पॉस’ यंत्रणेत जातीचा रकाना आलाच कसा? हा प्रकार कोणी आणि का केला? खतखरेदीसारख्या एका सर्वसामान्य व्यवहारात जातीचा तपशील घुसडण्याचे कारण काय? यावरून राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य व केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. अशा प्रकारामुळे सरकारचीच जातीय मानसिकता दिसत आहे. ज्या सरकारने जाती निर्मूलनासाठी काम करायला हवे, तेच सरकार जातीयतेला खतपाणी घालत असेल तर काय म्हणाल?
जात नाही ती जात असे म्हटले जाते, ते खरे आहे. त्यामुळे आज देशभरात जातीय डोलारा उभा करण्यात आला आहे. परंतु याच्या मुळाशी गेले पाहिजे. कारण जातीव्यवस्था हा भारताला लागलेला कॅन्सर आहे. मात्र देशात जाती कुणी निर्माण केल्या, यावर विचार करण्याची वेळ आहे. सिंधुघाटी सभ्यतेत भारतात माणसाच्या जाती नव्हत्या. एकदिलाने नांदणारी ती मौर्यकालीन राजवट होती. मात्र पुश्यमित्र शुंग नावाच्या ब्राम्हणाने कपटाने सम्राट ब्रहद्रथ मौर्य यांची हत्या केली, त्यानंतर त्यांनी जातीव्यसस्था निर्माण केली. जातीव्यवस्था अशी निर्माण केली की, प्रत्येक जात एकमेकाला कमी लेखते. एवढेच नाही तर एवढ्या सुक्ष्म जाती ब्राम्हणांनी निर्माण केल्या त्याला काहीच सीमा नाही.
आजच्या घडीला एससीचे १ हजार ८०० तुकडे केले. एसटीचे ८०१ तुकडे केले तर ओबीसीचे ३ हजार ७४३ तुकडे विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणांनी केले. त्यामुळे मूलनिवासी बहुजन समाज जाती-पातीत अडकत गेला आणि आपल्याच डीएनएच्या लोकांशी तो लढत राहिला. मात्र ज्यांनी जाती निर्माण केल्या त्या डीएनएच्या आधारे विदेशी असलेल्या ब्राम्हणांशी लढलाच नाही. कारण जाती या देवाने निर्माण केल्या आहेत अशी बतावणी ब्राम्हणांनी केली. त्या बतावणीवर बहुजनांनी तर्कच केला नाही. केवळ ब्राम्हण सांगतोय म्हणून आंधळेपणाने विश्वास ठेवला.
बहुजनांनी तर्क का केला नाही तर त्यांच्याकडे शिक्षणच नव्हते. कारण शिकण्याचा अधिकारच नव्हता. भारतात विदेशी ब्राम्हणांनी जाती का निर्माण केल्या तर त्यांना या देशावर वर्चस्व राखायचे होते. ब्राम्हण अल्पसंख्य असल्याने बहुसंख्यांकांना गुलाम बनवू शकत नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, आदिवासींचे सेग्रीगेशन, महिलांची गुलामी, ओबीसीवर शुद्रत्व थोपवले. एनटी-डीएनटीला बहिष्कृत केले. एससीला अस्पृश्य केले. असे अनेक कारनामे ब्राम्हणांनी केले. म्हणजेच ब्राम्हणांनी निर्माण केलेली जातीव्यवस्था आज डोके वर काढताना दिसत आहे. जनावरांची व्यवस्था ब्राम्हणांनी भारतात लादली आणि बहुजनांनी ती स्विकारलीही. जगात कुठेही जातीव्यवस्था नाही, केवळ भारतातच आहे.
केंद्रातील आरएसएस-भाजपा व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने खतखरेदीसारख्या अत्यंत साध्या व्यवहारात शेतकर्यांवर ‘जातसक्ती’ केली आहे. खतखरेदीसाठी आता ‘जात’ लिहावी लागणार आहे. म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शेतकर्यांना ‘जात’ लिहण्याचा फतवा काढण्यात आला असेल तर शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे. महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. कारण येथील महापुरूष राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा दिला.
त्याच महाराष्ट्रात अशाप्रकारची थेरं केली जात असतील तर ती खपवून घेता कामा नये. शेतकर्यांना सावरण्याचे सोडाच उलट त्यांना जातीत बंदीस्त करून राज्य सरकार काय संधीसाधूपणा करत आहे यावर सांगायला हवे. अवकाळी पावसाने शेतकर्याचे कंबरडे मोडले असताना त्याच्या कंबरड्यात ‘जाती’चा हातोडा घालत असाल तर तो शेतकरी उभा राहिल का? म्हणजे शेतकर्याला देशोधडीला लावण्याचे काम केले जात आहे.
आजच्या घडीला राज्यात गेल्या सात महिन्यात १ हजार ०२३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याला शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, मात्र दिवसेंदिवस शेतकर्यांच्या आत्महत्यांचा आकडा पाहता त्यांची ती घोषणा कधीच हवेत विरली आहे. अशाप्रकारे शेतकर्यांची थट्टा करण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे. शेतकर्यांची अशी थट्टा का केली जाते, कारण शेतकर्यांच्या मतांची आज गरज नाही.
राजकीय पक्षांना ईव्हीएममध्ये घोटाळा करून निवडून येता येते. मग शेतकरी असो अथवा सर्वसामान्य माणूस. कुणाच्याच प्रश्नांची उकल होत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारे जातीव्यवस्थेला खतपाणी घातले जात असेल तर पुरोगामीत्वाचा डांगोरा का पिटला जात आहे? आज राज्यात सत्तेवर असलेली शिंदे-फडणवीस ही जोडगोळी बहुजनविरोधीच आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात केवळ हिंदुत्वाचे म्हणजे ब्राम्हणत्वाचे कुविचार घोळत असतात. त्यातूनच अशा घटना वाढीस लागल्या आहेत. जातीव्यवस्था मजबूत करण्याचे काम हेच लोक करत असतील तर ब्राम्हणांचे फावणार नाही काय? फडणवीस यांना तेच हवे आहे. अशा प्रतिगामी सरकारला लोकांनी धडा शिकवण्याची गरज आहे.
दिलीप बाईत
९२७०९६२६९८
PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.