मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घोषणा हवेत विरली
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना राज्यात यापुढे शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होईल अशी घोषणा केली होती, मात्र ही घोषणा हवेत विरली असून केवळ सात महिन्यात राज्यात १ हजार ०२३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे. तोच अडचणीत असेल तर राज्याचे आणि देशाचे अर्थचक्र फिरु शकत नाही. कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना सरकारने कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार कृषी खात्यातल्या बदल्या, पदोन्नती आणि भरतीमध्ये अडकले आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.
कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये, असे आदेश दिल्याचे सरकार म्हणते पण, फिल्डवर वेगळीच स्थिती आहे. शेतकर्यांच्या वीजेची कनेक्शन तोडली जात आहेत. कृषी धोरणानुसार वीज थकबाकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन ती माफ करायला हवी अशी मागणी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस करत होते. मग आता ते मागे का सरकत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
राज्यात राष्ट्रीयकृत बँका शेतकर्यांना कर्ज देत नाहीत. शेतकर्यांचे ‘सिबील’ स्कोअर बिघडल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकर्यांना अडचणीच्या काळात बँकांनी कर्ज दिले नाही तर मग त्यांना नाईलाजाने सावकारांच्या दाराशी उभे रहावे लागते. ती कर्जफेड त्यांच्याकडून होत नाही आणि मग आत्महत्येपर्यंत शेतकरी पोहोचतो. हे मोठे दुष्टचक्र आहे. ते भेदण्यात सरकार अपयशी ठरत आहे असे ते म्हणाले.
नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाने राज्यातली शेती अडचणीत आली आहे. शेतमालाला मातीमोल दर मिळत आहे. भाजीपाला, शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातल्या बळीराजावर आली. खतांच्या वाढलेल्या किंमती, बोगस बियाण्यांचा प्रश्न, घसरलेल्या ‘सीबील’मुळे बँका कर्ज देत नाहीत, कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडली जात आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यातला शेतकरी खचला आहे. त्यामुळे राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असून रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.
२०१४ ते २०१९ या देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या काळात ५ हजार ०६१ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. उद्धव ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात १ हजार ६६० तर एकनाथ शिंदे यांच्या केवळ जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या सात महिन्यांच्या काळात १ हजार ०२३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.
एकनाथ शिंदे यांनी राज्यात यापुढे एकही शेतकर्यांची आत्महत्या होऊ देणार नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होईल असे सांगितले होते. पण, केवळ सात महिन्यात हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या हाच का तुमचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.
PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.