×

‘आरएसएस’ पासून देश व संविधानाला धोका असल्याने मुख्यालयावर मोर्चा

Published On :    23 Sep 2022  By : MN Staff
शेयर करा:


नागपुरातील पत्रकार परिषदेत डॉ.विलास खरात यांचे स्पष्टीकरण





नागपूर: देश व संविधानाला ‘आरएसएस’ पासून धोका आहे. त्यामुळेच त्यांच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जात आहोत. हा मोर्चा किमान ५ लाख लोकांचा असेल असे स्पष्टीकरण भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.विलास खरात यांनी केले. आरएसएस मुख्यालयावर मोर्चा का घेऊन जात आहोत याची माहिती देण्यासाठी नागपुरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला प्रेमकुमार गेडाम, गौतम बनसोडे, भन्ते हर्षबोधी यांची उपस्थिती होती.


आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाणे सर्वांना आश्‍चर्य वाटत आहे.  त्याचे कारण असे आहे की, २७ जून, २०२२ रोजी हरियाणा रोहतक जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाची राज्यस्तरीय डीएनए परिषद होती. हरियाणामध्ये भाजपाचे सरकार आहे. हरियाणातील भाजपाचे खासदार, आरएसएसच्या लोकांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले की, वामन मेश्राम यांना रोहतकमध्ये येऊन देऊ नका. पावसाच्या कालखंडात हॉलमध्ये कार्यक्रम होतो. त्या हॉलच्या मालकाला धमकी देण्यात आली. तो कार्यक्रम होऊ नये यासाठी मिल्ट्री फोर्स लावण्यात आला. आम्ही लोक संविधानाच्या कक्षेत राहून काम करू इच्छितो. त्यासाठी टक्कर होऊ नये म्हणून आम्ही दिल्लीत कार्यक्रम शिफ्ट केला. २७ तारखेला दिल्लीत डीएनए परिषद घेऊन घोषणा केली की, भारतीय संविधानाने कलम क्र. १९ नुसार बोलण्याचा अधिकार दिला आहे, त्यावर हे बंदी लादत आहेत. संविधान धोक्यात आहे. आरएसएस-भाजपाचे लोक हे करत आहेत म्हणून त्यांच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहोत. २१ ऑगस्टला उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये ३७ वा बामसेफचे राज्य अधिवेशन होते. १४४ कलम लागू करण्यात आल्याचे सकाळी बातमी आली. बामसेफच्या कार्यक्रमाला कुणी लोक जाणार नाहीत. आमचा जो निर्धारित कार्यक्रम त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या माध्यमातून सरकार पाडू शकतात, त्यामुळे कुठल्याही प्रकारे देशात विरोधी दल नाही. बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा जो सामाजिक संघटन आहे, त्यांच्यावर बोलण्याची बंदी लादण्यात आली. त्यामुळे ६ ऑक्टोबरला आम्ही तारीख फिक्स केली आहे. देशभरातील किमान ५ लाख लोक आरएसएस मुख्यालयावर धडकतील, त्यात १३ प्रमुख मुद्दे आहेत. १३ प्रमुख मुद्यासंदर्भात तुम्हांला हँडबील देण्यात आले आहे.


दुसरा मुद्दा असा आहे की, ईव्हीएम घोटाळा करूनच भाजपा निवडणूक जिंकत आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा केला जातो असा दि. ८ ऑक्टोबर, २०१३ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट लावली जावी असेही न्यायालयाचे म्हणणे आहे. विदाऊट व्हीव्हीपॅट निवडणुका होत आहेत. हादेखील आमचा अजेंडा आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना केली जात नाही. स्वत: प्रधानमंत्री मोदी मी ओबीसी असल्याचे सांगतात आणि न्यायालयात लिहून देतात की ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही. हे मोठे षड्यंत्र आहे. संविधान बदलण्याचे षड्यंत्र केले जात आहे असे नाही तर संविधान बदलण्यात आले आहे. सर्व सरकारी कंपन्या विकल्या आहेत. रेल्वे, एअर लाईन्स, नाल्को, टाल्को, टेल्को, हिंदुस्थान पेट्रोलियम विकले आहे. या सार्‍या बाबी प्रसिद्धी माध्यमातून येत आहेत. सार्‍या सरकारी कंपन्या विकल्या आहेत, संविधान बदलण्यात आले आहे. १२ ऑगस्ट, २०२२ मध्ये टाईम्स ऑफ इंडिया व दैनिक जागरण जो लिडींग वर्तमानपत्र आहे, त्यांनी लिहले आहे की, हिंदू राष्ट्राच्या संविधानाचे प्रारूप तयार आहे. वर्णव्यवस्थेच्या आधारित हे नवीन संविधान असणार आहे. प्रसारमाध्यमातून ही आम्हांला माहिती मिळाली. एससी, एसटी, ओबीसी हिंदू नाहीत. हे ऐकून सरकार काय म्हणेल याची आम्हांला भीती नाही. संविधानाने आम्हांला एससी, एसटी, ओबीसी नाव दिले आहे. मायनॉरिटी नाव मिळाले आहे याची माहिती डॉ.खरात यांनी दिली.


१८७३ मध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने आर्य समाजाची स्थापना केली. त्यांनी हिंदू समाजाच्या नावावर संघटन बनवले नाही. त्यांनी सत्यार्थ प्रकाश पुस्तकात पान नं. ८१ वर लिहले की, ‘हे ब्राम्हणो तुम अपने आपको हिंदू मत कहो’ हिंदू पर्शियन शब्द आहे. हे मुघलांनी दिलेला शब्द आहे. हिंदूचा अर्थ छळी-कपटी, गुलाम होतो. त्यावेळी ते हिंदूचा अर्थ सांगत होते. मात्र आज हिंदू एक पेहराव आहे. हिंदू एक मुखवटा आहे. एससी, एसटी, ओबीसींचे समर्थन मिळवून ब्राम्हण राष्ट्र स्थापन करणे हा डावपेच आहे. यामध्ये आणखी एक सनसनीखेज बातमी आहे की, आरएसएस लोकतांत्रिक संघटन नाही. आरएएसचे कुठलाही ऑडिट होत नाही. आरएसएस पंजीकृत संस्थादेखील नाही. आरएसएस आतंकवादी संघटन आहे. अजमेर शरीफ बॉम्बस्फोटात आरएसएसच्या तीन प्रचारकांना आजीवन कारावास झालेला आहे. काही दिवसांपूर्वी आरएसएसशी जोडलेला व्यक्ती शिंदे याने नांदेड कोर्टात प्रतिज्ञापत्र लिहून दिले की, आरएसएस मुख्यालयात आयबीचे लोक बॉम्ब बनवण्याचे व बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देतात. त्यामुळे आरएसएसवरदेखील बंदी हवी अशी आमची मागणी असल्याचे डॉ.खरात यांनी सांगितले.


लोकशाही मार्गाने मोर्चा काढणार आहेत. पोलीसांनी परवानगी दिली नाही आणि त्यांनी अडवले तर काय करणार? असा प्रश्‍न पत्रकाराने विचारला असता डॉ.विलास खरात म्हणाले, ज्या लोकांनी संविधानच समाप्त केलेले आहे. पोलीसांकडे आम्ही पत्र दिलेले आहे. त्यांचे अजून उत्तर आलेले नाही. परवानगी देत नाही असे त्यांनी अद्यापि म्हटलेले नाही. तुमचा मार्ग कसा असणार आहे. किती स्वयंसेवक असणार आहे. त्यांची गुप्तचर यंत्रणा त्याचवेळी चौकशी करून गेले होते. आमच्या लोकांना फोन येत आहेत, कधी काढणार आहात. त्यांनी परवानगी देवो अथवा न देवो हा मोर्चा देशाला वाचवण्यासाठी आहे. हा मोर्चा या देशात लोकांमध्ये जी भीती निर्माण झाली आहे ती भीती दूर करण्यासाठी आहे. बिल्कीस बानो महिला आहे. ती भारताची नागरिक आहे. बलात्कार केला तिच्यावर. ब्राम्हण सज्जन असतात असे सांगून त्यांना सोडून देण्यात आले. ज्यांना जेल झाली आहे ते सज्जन असतात का? बलात्कारी सज्जन असतात? असा सवाल करतानाच हे भयंकर आहे, या देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला सोडण्यात आले. मिल्ट्री इंटिलिजन्स ब्युरोने सांगितले की, त्याने मिल्ट्रीचे हत्यार विकले आहेत. त्यांनी त्याला आतंकवादी घोषित केले, तो बाहेर आहे. प्रज्ञा ठाकूरला खासदार बनवले आहे. देशात आतंकवादी लोक देशभक्त झाले आहेत. आश्‍चर्यकारक गोष्ट आहे. त्यांनी विरोध केला व परवानगी नाकारली तरी हा मोर्चा निर्धारित वेळेला जाणार आहे. हा दृढ निश्‍चय असल्याचे डॉ.खरात यांनी ठणकावून सांगितले.


दीक्षाभूमीवर आरएसएसशी संबंधित जोडलेल्या तीन ब्राम्हणांचा कब्जा आहे. एकाचे नाव आहे निर्झर कुलकर्णी, दुसर्‍याचे नाव आहे अशीष द्विवेदी आणि तिसर्‍याचे नाव आहे के.पी.जोशी. यांना समितीवर दाखवलेले नाही तर दीक्षाभूमी व्यवस्थापनावर त्यांना घेण्यात आले आहे. तुमच्याच वर्तमानपत्रात मी एकदा वाचले, मला एकदा फोन आला पहाटे सहा वाजता. खरात... साहेब आपल्याला माहित आहे का? दीक्षाभूमीवर बॉम्बस्फोट झाला. अरे, अफवा असू शकते असे काही नाही. वर्तमानपत्राची हेडींग आहे, दीक्षाभूमीवर बॉम्बस्फोट, १२ लोक मेले.  १७ मिनिटात पोलीस आले आणि छोट्या अक्षरात लिहले होते हे मॉकड्रील आहे. पत्रकाराने लिहले मॉकड्रील आहे. आता मॉकड्रील किती लोकांना समजून येते. मॉकड्रीलचा काय अर्थ आहे? हे नाटक आहे. दिखावा आहे. सुरक्षेसाठी आहे ते. ते कोण करत आहेे, तर ते तीन लोक करत आहेत. मॉकड्रील कोण करत आहे तर कुलकर्णी, द्विवेदी व जोशी. हा पुरावा आहे की, त्यांचे नियंत्रण आहे. त्यांना मॉकड्रील करायचे होते तर त्यांनी आरएसएस मुख्यालयावर करायचा होता. ज्यावेळी सरकारला धोका निर्माण होतो तेव्हा आतंकवादी लोक हल्ला करत आहेत असा कांगावा मोहन भागवत करतात. त्यामुळे आरएसएसचे नियंत्रण आहे. कालचीच बातमी आहे की, भाजपाच्या अनु.जातीचा सेल दीक्षाभूमीचे नियोजन करेल. भाजपा पैदा झाली नव्हती तेव्हा दीक्षाभूमी काम करत नव्हती का? दीक्षाभूमीवर कार्यक्रम होत नव्हते का? दीक्षाभूमीचे कामकाज सुरूच होते असा हल्लाबोलही डॉ.खरात यांनी केला.


धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी आपापल्या पक्षाच्या नियंत्रणात कार्यकर्ते काम करतात, तो त्यांचा कार्यक्रम आहे. या प्रश्‍नावर डॉ.खरात म्हणाले, दीक्षाभूमी सोहळ्यासाठी भाजपाच्या भूमिकेचे वाटप हे काय आहे? भाजपाच्या अनु.जातीच्या सेलचा अध्यक्षाचे नाव आहे, धर्मपाल मेश्राम. तो वकील आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धर्मांतर केले, त्या दिवशी श्याम हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची मिटींग घेतली. अनु.जातीच्या नावाखाली धर्मपाल मेश्रामला तेथे जाण्याचा नैतिक अधिकार नाही. मिटींग घेऊन डॉ.आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की ५७ च्या निवडणुका असतील त्यामध्ये मी राखीव जागांवर निवडणूक लढवणार नाही. कारण आता मी बुद्धधम्मीय झालो आहे. बुद्ध धम्मीय झालेल्या लोकांना राखीव जागा लागू होत नाहीत. धर्मपाल मेश्राम कोण तर अनु.जातीच्या सेलचा अध्यक्ष आहे. बाबासाहेबांनी अस्पृश्य जातीला बुद्ध धम्मात आणले, भाजपाच्या लोकांनी बुद्धधम्मीय झालेल्याला महार बनवले. म्हणजे त्याला पुन्हा रिव्हर्स गिअरवर नेले आहे. त्याची त्याला लाज वाटली पाहिजे. आमचा विरोध या अर्थाने आहे. आरएसएस-भाजपाला आमचा विरोध का आहे? आरएसएस-भाजपाने एससी, एसटी, ओबीसीला मूर्ख बनवलेच बनवले, बौद्धांचे संघटन आरएसएसने बनवले. हे प्रच्छन्न बौद्ध आहेत. जसे शंकराचार्याने हत्या केल्या. त्या संघटनेचे नाव आहे भारतीय बौद्ध संघ. शिखांचे बनवले ईसाई राष्ट्रीय मंच. मुसलमानांचे बनवले मुस्लिम राष्ट्रीय मंच. याचे मुख्य कुणाला बनवले ज्याने देशभरात २२ ठिकाणी बॉम्बस्फोट केले त्या इंद्रेशकुमारला. वेगवेगळ्या मायनॉरिटीचे मुख्य बनवले. जो आतंकवाद्यांच्या यादीत समाविष्ट आहे, तो बौद्धांचा नेता कसा असेल? तो ख्रिश्‍चनांचा नेता कसा असेल? तो ईसाईंचा नेता कसा असेल? अशी प्रश्‍नांची सरबत्ती डॉ.खरात यांनी केली.


आमचा विरोध ब्राम्हणांना का आहे? यावर बोलताना डॉ.खरात म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे १९५४ चे ब्रम्हदेशातील भाषण आहे. ते म्हणतात, आता इस्लामपासून बौद्ध धम्माला धोका नाही. ब्राम्हणांपासून धोका आहे. कारण ब्राम्हण वर्णव्यवस्था व गैरबराबरी मानतो. बुद्धीझम समानता मानतो. बुद्ध धम्माच्या आंदोलनात ब्राम्हणाला आम्ही आतमध्ये घेतले तर तो त्या आंदोलनाची दिशा बदलून टाकेल. त्यामुळे भारतात बुद्ध धम्माच्या आंदोलनाला पुर्नजिवित करताना या आंदोलनाता ब्राम्हणावर बंदी लादतो. आम्ही सिद्धांताच्या आधारावर विरोध करत आहोत. धर्मपाल मेश्रामला आमचे सांगणे आहे की, तू बुद्ध बनून रहा, महार का बनत आहेस? महार बनू नकोस, कलंक लागेल.


काल एक प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद झाली, २३,२४,२५ तारखेला रेशीमबागेत. तेथे एक वकील होते. तेथे पत्रकारांनी त्यांना प्रश्‍न विचारले, त्या वकीलाला एक प्रश्‍न विचारण्यात आला की संविधाननिर्माते कोण आहेत? त्यावर ते म्हणाले, देशाची जनता संविधानाचे निर्माते आहेत. अनेकदा त्यावर प्रतिप्रश्‍न विचारण्यात आले. परंतु त्याने काही मानले नाही. आपले संघटन चांगले काम करत आहे. परंतु २३, २४, २५ तारखेला एक रेशीमबागेत डिबेट होणार आहे. त्यांचा डिबेट संविधानावर आहे. मुस्लिमांवर आहे. त्यांचा खास मुद्दा आहे मायनॉरिटी. मुस्लिमांना हटाओ, हा त्यांचा अजेंडा आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेसंदर्भात त्यांनी कठोरतापूर्वक भाष्य केले. संविधान निर्माते देशातील जनता आहे त्या वकीलाच्या अशा उत्तरावर काय म्हणाल? या प्रश्‍नावर डॉ.खरात म्हणाले, आम्ही हेच सांगत आहोत की, आम्ही नागरिक आहोत. जर पत्रकारदेखील एक नागरिक आहे. जर देशाच्या संविधानालाच रिजेक्ट केले तर कुठली पत्रकारिता चालणार आहे? देशात कुठले लोकतंत्र राहणार आहे? प्रभात प्रकाशन आरएसएसचे आहे. त्यांचे एक पुस्तक आहे.  भागवतजी...यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्याचे हेडींग असे होते ‘भारताचे संविधान भारताचे आहे की इंग्रजांचे’. म्हणजेच लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हे केले जात आहे. मग इंग्रजांचे नाव घ्यायचे. त्यासारखे ते शब्दांचा प्रयोग करतात. आपण जे सांगत आहात त्यानुसार हा विषय फार पुढे गेलेला आहे. त्यामुळेच आम्हांला रस्त्यावर यावे लागत आहे. परिषद आयोजित करण्यात आली आहे तेथे देवेंद्र फडणवीस येणार आहे. नाही...तेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ येणार आहेत असे पत्रकाराने सांगितले, मात्र देवेंद्र फडणवीस भीमा-कोरेगाव दंगलीचा मास्टरमाईंड आहे. देवेंद्र फडणवीसची आयोगासमोर चौकशी सुरू आहे याची माहिती डॉ.खरात यांनी दिली.


विजयादशमीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये ते येणार आहेत, आपण काय करणार आहात? या प्रश्‍नावर डॉ.खरात म्हणाले, आम्ही त्याला विरोध करत आहोत. जोपर्यंत भीमा-कोरेगाव दंगलीच्या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध होत नाही. कारण तो आरोपी आहे. मी कायद्याच्या दृष्टीकोनातून सांगत आहे. भीमा-कोरेगावच्या दंगलीसंदर्भात देवेंद्र फडणवीसला आरोपी म्हणून पाहिले गेले आहे. ते मुख्यमंत्री व गृहमंत्रीही होते. त्यामुळे आरोपीने तेथे येऊ नये असे आमचे म्हणणे आहे.


ज्या दिवशी भीमा-कोरेगावला दंगल झाली, त्या दिवशी कुठल्या शोरूमचे उद्घाटन करण्यासाठी हेलिकॉप्टरने गेेले होते. तेथून ते ३० कि.मी.अंतरावर होते. वरून दगडफेक केली जात होती, ती दगडफेक कुठे जात होती? या प्रश्‍नावर डॉ.खरात म्हणाले, वृत्तपत्रांच्या बातम्यानुसार ते त्या दिवशी शनीशिंगणापूरमध्ये होते. ते तेल ओतत होते. मात्र या बाबीला ते जबाबदार आहेत. आरोपी व्यक्तीला तेथे येऊ न देणे गरजेचे आहे.


आपण तिसरा मुद्दा टाकला आहे की, ईव्हीएम आणि आरएसएसचा काय संबंध आहे? आरएसएस एक संघटन आहे? या प्रश्‍नावर डॉ.खरात म्हणाले, डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी ईव्हीएमच्या संदर्भात अनेक बाबी युट्युबवर सांगितल्या आहेत. ईव्हीएममध्ये घोटाळा करून हे लोक जिंकतात, त्यासाठीच ते स्वत: सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर दि. ८ ऑक्टोबर, २०१३ चा निकाल आला. २०१४ च्या निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट लावावेत असे आदेश दिले गेले. मात्र ०.३१ टक्के व्हीव्हीपॅट लावण्यात आले. म्हणजेच घोटाळा करण्यासाठी अनुमती देण्यात आली. याला अनुसरून वामन मेश्राम यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला. २०१७ मध्ये ते खटला जिंकले. त्यानंतर आणखी एक मनुसंघवी यांनी खटला दाखल केला. त्यामध्ये ५० टक्के मोजणीची मागणी केली. ईव्हीएम आहे तर पुरा व्हीव्हीपॅट लावा. ईव्हीएम घोटाळा करूनच ते सत्ता शासनात आले आहेत. याबाबत डिटेलमध्ये बोललेलो आहे.


रोहतकमध्ये डीएनए परिषद रोखण्याचा त्यांचा काय उद्देश होता? या प्रश्‍नावर डॉ.खरात म्हणाले, ब्राम्हणांचा डीएनए आर-१ ए-१ आहे. ज्यांनी येथील लोकांना ६.५ हजार जातीत विभागले त्या लोकांना डीएनए आहे एल-३ एमएन-३. दोन वेगवेगळी नाव आहेत. राखीगढी डीएनए संशोधन झाले त्यामध्ये त्यांचा डीएनए मिळालेला नाही. डेक्कन महाविद्यालयाचे वसंत शिंदे जे प्रिन्सिपल होते त्यांना पुढे करून वनसाईड बकवास करण्याचे काम करण्यात आले. त्यांच्या आगमनाचादेखील पिरीयड मिळाला आहे. राखीगढी एकदम जुनी आहे. ४ हजार ७०० वर्षापूर्वीची. ब्राम्हणांचे स्थलांतर आहे ४ हजार वर्षापूर्वीचे. ते भारतात आलेच नव्हते तर त्यांचा डीएनए कसा मिळेल? असा सवाल डॉ.खरात यांनी केला.


३ तारखेच्या बौद्ध परिषदेला तुमचा विरोध असणार आहे. गगन मलिक त्यांना समर्थन करत आहे. तुमचे समर्थन आहे का? या प्रश्‍नावर डॉ.खरात म्हणाले, गगन मलिक एक अभिनेता आहे.  गगन मलिक भिक्खूच्या वेशात फिरत आहेत. गगन मलिकने देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मूर्त्या वाटप करण्याचा एक अर्थ असा आहे की, अयोध्या म्हणजेच साकेत आहे तेथे जेसीबी लावून तोडफोड करण्यात आली. तो बुद्धीस्ट विहार आहे. सम्राट अशोका यांचे चार विहार आहेत. त्यावेळी गगन मलिक गप्प आहे. गीर सोमनाथमध्ये तीन मंदिरे बुद्ध विहार आहे. पुरातत्व विभागाच्या अहवालात आहे. नरेंद्र मोदी यांनी चौकशी करायला लावली होती. गगन मलिक गप्प आहे, आता जे बुद्धगयेत ब्राम्हणांचा कब्जा आहे त्याच्यावर गगन मलिक गप्प आहे. गगन मलिकने ब्राम्हणांचा कब्जा हटवावा आणि ८४ हजार बुद्ध विहारे आहेत त्याला वाचवण्यासाठी गगन मलिकने पुढाकार घेतला तर समर्थनाचा मुद्दा राहिल. गगन मलिकला भिक्खूच्या वेषात दाखवून जगाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम आरएसएस-भाजपाने हाती घेतला आहे अशी आमची शंका आहे. त्यांची लिंकअप पाहिली तर ते आरएसएसचे आहेत, त्यांच्या अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांनी वारसा वाचवण्यासाठी भूमिका घ्यायला हवी होती. दीक्षाभूमीवर आरएसएसचा कब्जा आहे. ते वाचचवण्यासाठी भूमिका घ्यायला हवी असे डॉ.खरात यांनी सांगितले.




PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीचेे 2 प्लांट बंद कर
शिरूर तालुक्यातील जांबूत येथील घरकूल घोटाळा प्रकरणी बह
भारत देशात बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, नाहीतर निवडणूक आ
आरएसएस या आतंकवादी संघटनेचा प्रमुख विदेशी ब्राम्हण मोह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper