×

‘डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !’

Published On :    3 Aug 2022  By : MN Staff
शेयर करा:


गौरव तुझाच केला तुझ्याच संतत्वाचा, डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला ! मुखवटा तुझा त्याने परिधान केला होता, सोंग वारकर्‍याचे वठवून छान गेला !.





कर्जखाते असलेल्या नोंदीची दस्तवेज इंद्रायणीत बुडवून लोकांना कर्जमुक्त करणारे जगातले पहिले महापुरुष म्हणून जगद्गुरू तुकोबाराय यांचे नाव घेतले जाते तर दुसरीकडे ज्यांचे सरकार आल्यापासून महागाई बेरोजगारीमुळे लोकांना दोन वेळेच्या जेवणाचे वांदे निर्माण झाले. आज लोकांना प्राथमिक गरजाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, त्यामुळे ते बँकांकडून किंवा खाजगी सावकारांकडून पैसा घेऊन लोक स्वतःच्या कुटुबांची उपजिवीका भागवत आहेत. 


आज लोक कर्जमुक्त होण्याऐवजी  कर्जबाजारी होत आहेत. कारण भाजप सरकारने सगळा सत्यानाश केला म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण एकीकडे देशातील जनता दुष्काळात होरपळत असताना दुसरीकडे मागिल वर्षी शिर्डी येथील नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च केला होता. त्याठिकाणी ८०० बस लावण्यात आलेल्या होत्या. तेव्हा प्रश्‍न पडतो की, देहू येथील मोदींच्या कार्यक्रमासाठी किती पैसा उधळला असेल? हा पैसा जनतेने दिलेल्या करातून जमा झालेला म्हणजे लोकांचा नाही का?


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले होते की, मी पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूतील मंदिराच्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत : दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं असे म्हणाले. 


त्या मोदींना सांगावेसे वाटते की, तुकोबांनी समाजाला दिशा देऊन नवा मार्ग दाखवला होता पण तुम्ही व तुमचे संघी समर्थकांनी समाज दिशाहीन केला त्याचे काय? नरेंद्र मोंदीनी तुकोबांची पगडी व विणा हाती घेऊन खुप काही कमावल्याचा गवगवा केला परंतु कोणी टिळा टोपी परिधान केली म्हणजे तुकोबा होत नाही, हे संघी समर्थकांनी समजुन घ्यावे. म्हणून तर प्रा. पंजाबराव येडे म्हणतात की, डोक्यावर पगडी घातल्याने तुकाराम होता येत नाही, हातात वीणा धरल्याने कुणी संत होत नाही तसेच प्रा. प्रकाश नाईक म्हणतात की,


गौरव तुझाच केला तुझ्याच संतत्वाचा,
डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
मुखवटा तुझा त्याने परिधान केला होता,
सोंग वारकर्‍याचे वठवून छान गेला !.


देहूतील भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, सावरकरांनी जेलमधे हातकड्यांच्या चिपळ्या करुन तुकोबांचे अभंग म्हटले होते. त्या मोदींना सांगावे वाटते की, सावरकरांनी जेलमध्ये हातकड्यांच्या चिपळ्या करून अभंग म्हटले असे कोणताही इतिहाकार सांगत नाही परंतु हेच सावरकर तिथे नथुरामच्या नावाने शंख करत असतील व त्यांच्या आठवणीत ‘सदा सर्वदा नथुरामा योग तुझा घडावा, तुझे कारणी (खाली ?) देह माझा पडवा’ हा रामदासाचा शृंगार मंत्र नक्की म्हणत असतील हे कोणीही नाकारू शकत नाही. 


कधीच कुठे नसलेले सत्य मोदींनी देहुत सांगितले पण तुकोबांच्या गाथा इंद्रायणीत कोणी बुडवल्या हे सत्य का सांगितले नाही? म्हणून तर प्रेमकुमार बोके म्हणतात की, सावरकर जेलमधे हातकड्यांच्या चिपळ्या करुन वाजवत होते ही फुसकी सोडली, पण तुकोबांच्या गाथा कृरतेने नदीत बुडविणारे कोण होते हे सत्य मात्र सांगितले नाही !


संत तुकाराम महाराजांना ज्या भटुर्ड्यांनी आतोनात त्रास दिला पण ते तुकोबांचे विचार खोडू शकले नाहीत. आज त्यांचेच रामदासी वारसदार देखिल तोंडी तुकोबांची भाषा बोलताना दिसतात पण या बांडगुळांच्या मनी उघड फिरून महिलांची साडीचोळी परिधान करणारा रामदास, स्वतःच्या आईचे मस्तक उडवणारा परशुराम, पुरुषांसोबत चुमाचाटी करणारा नथुराम, महिलांवर बलात्कार करणारा आसाराम हे भटांचे आदर्श आहेत पण हे बहुजन समाज ओळखून आहे. 


त्यामुळे या बांडगुळांनी कितीही बहुजन महापुरुषांचे नाव घेऊन लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला तरी काही परक पडणार नाही. कारण, हे रामदासी समर्थक केवळ बहुजन महापुरुषांना कामापुरते वापरतात किंवा काहीतरी चुकीचे सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. देहू येथे रामदासाचे समर्थक परशुरामाचे वारसदार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुकाराम महाराजांच्या शब्दांच्या धनात इतकी ताकद होती, की ते शब्द कुणी मिटवू शकले नाहीत. 


इंद्रायणीत बुडवा किंवा शिळेनं बंद करा. पण ते तुकोबारायांचे शब्द होते, ते शब्द पुन्हा वर आले. त्या शब्दांनी जनाजनाला व्यापून घेतलं. त्यांनी जो मार्ग दाखवला होता त्या मार्गावर चालण्याचं काम आपले प्रधानमंत्री करत आहेत. ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र मोदींनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले प्रधानमंत्री खर्‍या अर्थाने वारकरी आहेत. 


तुकोबांच्या विचारांवर मोदी चालतात अस म्हणणार्‍या फडणवीसांना सांगावेसे वाटते की, दीन दुबळ्या आडल्या नडल्याला सहकार्य करण्याची शिकवण तुकोबांची आहे तर मोदींची धारणा ही केवळ संघ हिताची व भांडवलदारांचे पालन पोषण करण्याची आहे. मोदी रंजल्या गांजल्यांची सेवा करतात म्हणजे नेमकी कोणाची करतात? मोदींचे रंजल्या म्हणजे अदानी आणि गांजल्या म्हणजे अंबानी आहेत, हे आमच्या बहुजन समाजाने ओळखले आहे. 


म्हणून तर प्रा. प्रकाश नाईक म्हणतात की,
तुझी रंजली माणसे हा त्यांना गांजतो आहे,
फेकून चार गोष्टी तो टाळ्या खाऊन गेला !
पाडू उघडे पितळ या ढोंगी माणसाचे,
गावात तुझ्या जरी तो खाऊन भाव गेला !


पुण्यातील कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भुयारातील गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर यांची चित्रे असलेल्या स्थळाचे उद्घाटन केले. तेव्हा मोदींना विचारावेसे वाटते की, त्या गॅलरीत सावरकर नथुरामचा पृष्ठभाग चेपतानाचा फोटो आहे का? नसेल तर का नाही? हा फोटो त्या गॅलरीत नसेल तर सावरकर भक्तांचा जीव तळमळणार नाही का? कारण सावरकर व नथुरामचे अनैतिक संबंध होते हे माफीवीर सावरकर या पुस्तकात स्पष्टपणे लिहले आहे. 


मोदींची वर्तवणुक म्हणजे डब्बल ढोलकी आहे. एकीकडे तुकोबांची वेशभूषा करून नाटक करत रामदासी परशुरामी समर्थंकाची गळाभेट घ्यायची. तर दुसरीकडे बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा नाव घेऊन माफीवर पुरुषांच्या पृष्ठभागावर तहान भागवणारे सावरकर यांचे समर्थन करायचे याला डब्बल ढोलकी म्हणू नये तर काय म्हणावे भक्तांनो. म्हणून तर ज्ञानेश वाकुडकर म्हणतात की, उजळ माथ्यानं चार चौघात नाव घेता येइल, असा एकही नेता यांच्या कळपात आजवर निर्माण झालेला नाही. खरं तर याची लाज नव्हे, निदान खंत तरी का वाटू नये ?...खरं तर तुकाराम हे या लोकांना झेपणारे संत नव्हेत !


पिंपरी चिंचवड येथे भाजपाच्या वतीने एक बॅनर लावले होते. ज्यात पंढरीच्या पांडुरंगापेक्षा मोदींची प्रतिमा मोठी व तुकोबांच्या वेशभूषेत मोदींना दाखवण्यात आले होते. त्याबद्दल अकोला येथे आरएनओ या वृत्तसंस्थेशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने आज नाटक सुरू केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना जगद्गुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवून त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान केला आहे. 


ज्या पांडुरंगाला आमच्या संतांनी सर्वस्व मानलं त्या पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढे लहान करण्यात आली. यामागे भाजपाच्या आध्यात्मिक विकास आघाडीचा मेंदू आहे. भाजपाकडून वारंवार अशा पद्धतीने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचं पाप होत आहे. मोदी पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही हा माझा वारकरी म्हणून विश्‍वास आहे. 


त्यामुळे यामागील मेंदू शोधला पाहिजे, वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही. मी अशा कृत्याचा निषेध करतो असही ते म्हणाले. तेव्हा बॅनरच्या माध्यमातून तुकोबांचा कमीपणा दाखवणार्‍या बांडगुळांना सांगावेसे वाटते की, तुका आहे आकाशा एवढा मात्र त्यांची बरोबरी करणारा तुमचा नेता आहे मुतखड्या एवढा.


शेवटी बहुजन समाजाला सांगवेसे वाटते की, हे संघ समर्थक नरेद्र मोदी जरी तुकोबांचे नाव घेऊन टिळा टोपी परिधान करून नाटक करत असले तरी हेच मोदी तुकोबापेक्षा मनु श्रेष्ठ म्हणणार्‍या आंबा फेम मनोहर भिडेसाठी ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझी दंगलीतून सुटका करण्याकामी देह माझा तुझ्या कामी यावा’ असा मंत्र मनातल्या मनात म्हणत तिजोरीच्या चाव्यांचा खळखळट करत नसतील कशावरून..! म्हणून शेवटी प्रा. प्रकाश नाईक यांच्या शब्दात सांगावेसे वाटते की,


देहूत काल तुझ्या रे भोंदू येऊन गेला,
सवयीने नेहमीच्या थापा मारून गेला!
माखलेत हात ज्याचे रक्तात माणसांच्या,
बघ अहिंसेवरती बाता मारुन गेला!
               
 नवनाथ दत्तात्रय रेपे
  मो. ९७६२६३६६२



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीचेे 2 प्लांट बंद कर
शिरूर तालुक्यातील जांबूत येथील घरकूल घोटाळा प्रकरणी बह
भारत देशात बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, नाहीतर निवडणूक आ
आरएसएस या आतंकवादी संघटनेचा प्रमुख विदेशी ब्राम्हण मोह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper