×

गटार व सेप्टिक टँक साफ करताना १ हजार ०३५ सफाई कामगारांचा मृत्यू

Published On :    17 Mar 2023
साझा करें:

३० वर्षाची आकडेवारी केंद्राने केली सादर



नवी दिल्ली: गटार व सेप्टिक टँक साफ करताना १,०३५ सफाई कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. १९९३-२०२३ म्हणजेच ३० वर्षाची आकडेवारी केंद्राने सादर केली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी हाताने सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजनेवर विचारलेल्या प्रश्‍नाला केंद्र सरकार उत्तर देत होते. गेल्या फेबु्रवारी महिन्यात २०१८ ते २०२२ या कालावधीत गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना ३०८ लोकांचा मृत्यू झाला होता.

१९९३ पासून, देशभरात गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना एकूण १ हजार ०३५ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी ९४८ कुटुंबांना भरपाई देण्यात आली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाने १४ मार्च रोजी लोकसभेत ही माहिती दिली. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ५२ मृत्यू, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ४६ आणि हरियाणामध्ये ४०  मृत्यू झाले. महाराष्ट्रात ३८, दिल्लीत ३३, गुजरातमध्ये २३ आणि कर्नाटकात २३ जणांचा मृत्यू झाला.

अहवालानुसार, गेल्या ३ आर्थिक वर्षांपासून या योजनेसाठी अर्थसंकल्पीय वाटप कमी होत आहे. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने या योजनेंतर्गत कोणत्याही निधीची तरतूद केलेली नाही. २०२२ मध्ये, मंत्रालयाने स्वयंरोजगार योजना राष्ट्रीय कृती आराखड्यासाठी यांत्रिकीकृत स्वच्छता इकोसिस्टममध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ही यापुढे देशात प्रथा नाही असे सांगून या निर्णयाचे समर्थन केले. 


सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात  सुमारे ९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारने ५८ हजार ०९८ मॅन्युअल सफाई कामगारांची ओळख पटवली होती, या सर्वांना २०२० पर्यंत एकरकमी रोख रक्कम देण्यात आली होती. मिमी चक्रवर्ती यांना उत्तर देताना, २०२२-२३ पर्यंत एकूण ६०५ लाभार्थ्यांना गटार यंत्रणेच्या यांत्रिक साफसफाईसाठी भांडवली अनुदान दिले गेले. सरकारने २०२०-२१ ते २०२२-२३ या कालावधीत यासाठी भांडवली सबसिडीवर एकूण २ हजार १६५.७२ लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले.

बंदी असतानाही हाताने साफसफाई
१९९३ मध्ये देशात प्रथमच हाताने सफाईच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्ये कायदा करून त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आजही समाजात हाताने सफाई करण्याची प्रथा आहे आणि गटार साफ करताना लोकांच्या मृत्यूच्या बातम्या येत असतात. कोणत्याही व्यक्तीला गटारात पाठविण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत सफाई कामगाराला गटारात पाठवल्यास त्यासाठी २७ प्रकारचे नियम पाळावे लागतात. मात्र, या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याने गटार सफाई करताना कामगारांना जीव गमवावा लागतो.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बेंबी तट्ट फुगली तरी विदेशी भटा-ब्राम्हणांसाठी मध्य प्र
खोकला, तापावरील १४ औषधांवर सरकारची बंदी!
बालासोर रेल्वे अपघाताच्या ठिकाणी ‘कवच’ संरक्षण यंत्रणा
आता कोल इंडियावर खासगीकरणाची आफत
जे जे रूग्णालयातील ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे
ईव्हीएम घोटाळ्यावरील चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी कें
भाजपा ईव्हीएम मॅनेज करते
‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘द केरला स्टोरी’ संघाचा सरळ अजे
चिंताजनक: राज्यात २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य, ६० हजार श
वृत्तपत्रात जाहीरात न देण्यासाठी राजकीय पक्षांवर बडगा
महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, तीन महिन्यात
बीएमपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेन्द्र प्रताप सिंग यांच
पाटणा उच्च न्यायालयाची जातनिहाय सर्वेक्षणाला स्थगिती
उद्धव ठाकरे शेंडी-जानव्याचा उल्लेख करत असल्याने अल्पसं
छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण!
आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा, पांढरपेशे असा उल्ल
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या भारत बंदने शासक वर्गाच
केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारविरोधात राष्ट्रीय पिछडा व
बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत
ब्राम्हणांना महात्मा फुले यांच्या नावाची भीती का वाटते?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper