हिंदू-मुस्लिम तणाव वाढला की, बहुजन ब्राम्हण्यवाद्यांच्या मागे जातात या बाबीचा त्यांनी राजकीय लाभ उठविण्याचा निश्चय केला. जे बहुजन तरुण मुस्लिमांविरुद्ध भडकाऊ भाषणे करतील व मुस्लिमांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतील त्यांना आरएसएसमध्ये व ब्राम्हण्यवादी राजकीय पक्षात पूर्वीचा जनसंघ व आताची भारतीय जनता पार्टी या पक्षात महत्वाची पदे देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यास त्यांनी सुरुवात केली.
हिंदू-मुस्लिम तणाव वाढला की, बहुजन ब्राम्हण्यवाद्यांच्या मागे जातात या बाबीचा त्यांनी राजकीय लाभ उठविण्याचा निश्चय केला. जे बहुजन तरुण मुस्लिमांविरुद्ध भडकाऊ भाषणे करतील व मुस्लिमांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतील त्यांना आरएसएसमध्ये व ब्राम्हण्यवादी राजकीय पक्षात पूर्वीचा जनसंघ व आताची भारतीय जनता पार्टी या पक्षात महत्वाची पदे देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यास त्यांनी सुरुवात केली. जो बहुजन नेता जास्तीत जास्त हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करेल, त्याला संघटनेत व पक्षात पदोन्नती मिळू लागली.
अशा नेत्यांच्या आज्ञा पाळण्याच्या व त्यांना महत्व देण्याचे नाटक करण्याच्या सूचना ब्राम्हण तरुणांना देण्यात आल्या. त्यानुसार ते त्यांना महत्व देण्याचे नाटक करु लागले. त्यामुळे या बहुजन नेत्यांना आपण खरोखरच मोठे झालो, असे वाटू लागले. मुस्लिमांच्या विरुद्ध अधिकाधिक आक्रमक होण्यासाठी बहुजन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली. त्याचा परिणाम म्हणून राज्यात व देशात हिंदू-मुस्लिम तणाव वाढत गेला व अनेक मोठ्या दंगली झाल्या. या दंगलीमध्ये दोन्ही समाजाची जिवित व वित्तहानी होत होती. पण त्याची ब्राम्हण्यवाद्यांना चिंता नव्हती. दंगलीमध्ये बहुजन मुले गुंतून राहतात याचा त्यांना आनंद होता. अशा प्रत्येक दंगली नंतर ब्राम्हण्यवाद्यांना त्याचा राजकीय फायदा होऊ लागला. जातीय दंगल त्यांच्यासाठी जणू जादूची कांडी ठरली.
हे पण वाचा: हिंदू-मुस्लिम दंगली व ब्राम्हण्यवादी (भाग-१)
ब्राम्हण्यवाद्यांच्या डावपेचांना प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरी कोणतीही धर्मनिरपेक्ष संघटना किंवा पक्ष अस्तित्वात नसल्याने आरएसएस व भाजपाने या हिंदू- मुस्लिम दंगलीच्या जादुच्या कांडीचा पुरेपुर उपयोग करुन घेतला व अनेक राज्यात सत्ता काबीज केली. त्यानंतर ते केंद्रात सत्ता काबीज करण्याच्या कामाला जोमाने लागले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी बाबरी मशीद व राम मंदिर हा मुद्दा व भावनिक श्रद्धेचा विषय उकरुन काढला. या प्रानावर ब्राम्हण्यवाद्यांनी बहुजनांच्या भावना इतक्या पेटविल्या व चेतविल्या की, देशभर जातीय दंगलीचा आगडोंब उसळला व त्याची परिणीती शेवटी १९९२ साली बाबरी मशिदीचा विध्वंस होण्यात झाली. त्याचा भाजपाला अपेक्षेप्रमाणे फायदा झाला व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा हा ब्राम्हण्यवादी पक्ष केंद्रात सत्ता मिळविण्यात यशस्वी झाला. याला ब्राम्हण्यवाद्यांच्या धर्मांध राजकारणाचा परिणाम म्हणता येईल.
पुढे २००२ ची गुजरात दंगल झाली. त्यामध्ये जवळजवळ २००० मुस्लिम मारले गेले व लाखो लोक बेघर झाले. गुजरात दंगलीमुळे भारताची जगभर बदनामी झाली. ही दंगल जाणीवपूर्वक वाढू देण्यासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, जे आरएसएसचे प्रचारक होते, ते दंगलीला जबाबदार आहेत अशी सर्वांची खात्री झाली. अनेक राष्ट्रांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या देशात येण्यास बंदी केली. त्यानंतर मात्र ब्राम्हण्यवाद्यांनी आपली कार्यपद्धती बदलली व दंगली घडविण्याबरोबरच मुस्लिमांना दहशतवादी ठरविण्यास सुरुवात केली, त्यासाठी त्यांनी एक देशव्यापी कट रचला.
आरएसएसमधील कट्टर ब्राम्हण्यवाद्यांनी २००३ साली अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. त्यांची मुख्य हेतू हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राम्हण्यवादी राष्ट्र निर्माण करणे हा होता. त्याचे सर्वेसर्वा आर्मीच्या गुप्तचर विभागातील लेप्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे होते. ते आर्मीतील आर.डी.एक्स. चोरुन देशभरातील ब्राम्हण्यवादी संघटनांच्या तरुणांना देत होते व त्यांना बॉम्ब बनविण्याचे व स्फोट करण्याचे प्रशिक्षण देऊन देशभर बॉम्बस्फोट करण्यास प्रवृत्त करत होते. या ब्राम्हण्यवादी तरुणांनी २००३ ते २००८ या काळात असे अनेक बॉम्बस्फोट केले. पण ब्राम्हण्यवादाचे संपूर्ण नियंत्रण असलेली देशातील गुप्तचर यंत्रणा आय.बी. व त्यांच्या हाताखालील बाहुले असलेली राज्यातील दहशतवादी विरोधी तपास पथके यांनी सर्व बॉम्बस्फोटासाठी मुस्लिम संघटनांना जबाबदार धरुन अनेक निरपराध मुस्लिम तरुणांना अटक केली व ब्राम्हण्यवादी सोशल मीडियाने व टीव्ही, चॅनेल यांनी त्याला भरपूर प्रसिध्दी दिली. त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाज बदनाम झाला.
सप्टेंबर २००८ मध्ये अशाच प्रकारच्या बॉम्बस्फोट नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहरात झाला. पण त्यावेळी महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख असलेले हेमंत करकरे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे या बॉम्बस्फोटाचा तपास केला व त्यासाठी जबाबदार असलेल्या अभिनव भारतच्या लेप्टनंट कर्नल व प्रज्ञा सिंग ठाकूर या अनेक ब्राम्हण्यवाद्यांना अटक केली. इतकेच नव्हे तर त्यांनी पूर्वीचेही सर्व बॉम्बस्फोट ब्राम्हण्यवादी संघटनांनीच केले होते असा निष्कर्ष काढला. ब्राम्हण्यवाद्यांच्या देशव्यापी देशद्रोही कटाचा पर्दाफाश केला व ब्राम्हण्यवाद्यांचे खरे कट कारस्थान बाहेर आले. या कटात सामील असणार्या देशभरातील अनेक प्रतिष्ठित समजल्या जाणार्या ब्राम्हण्यवाद्यांना अटक करणारच होते, पण तोपर्यत मुंंबईचा २६/११ चा अतिरेकी हल्ला झाला व त्यामध्ये आय.बी. ब्राम्हण्यवादी संघटना व मुंबई पोलिसचे काही ब्राम्हण्यवादी अधिकारी यांनी कट रचून हेमंत करकरेंची हत्या केली.
हेमंत करकरेच्या तपासामुळे भारतातील मुस्लिमांना जरी थोडासा दिलासा मिळाला तरी १२५ वर्षापासून होत असलेल्या हिंदू- मुस्लिम दंगली व त्याचे चुकीचे वार्तांकन, २००२ ते २००३ वर्षापासून ब्राम्हण्यवाद्यांनी देशभरात घडविलेले बॉम्बस्फोट व त्यामध्ये जाणूनबूजून मुस्लिम समाजाची केलेली बदनामी व अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक पसरविला जाणारा मुस्लिम द्वेष या सर्वांचा एकत्रित परिणाम मुस्लिम मनावर झाला. देशभरातील संपूर्ण मुस्लिम समाजाची सर्वच बाबतीत पिछेहाट झाली. सच्चर कमिशनच्या अहवालानुसार आज मुस्लिम समाज हा एससी व आदिवासी यांच्यापेक्षाही मागासलेला आहे.
आजही मुस्लिम समाज फक्त सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या अधिक मागासलेला नसून त्याचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. त्यामध्ये कमालीचा न्युनगंड आलेला आहे. इतकेच नव्हे तर त्याला एका अनामिक भीतीने ग्रासले आहे. काहीतरी अघटित घडेल किंवा घडविले जाईल व या देशात आगडोंब उसळेल अशी मुस्लिमांना भीती वाटते. देशातील सध्याची परिस्थिती पाहता ही भीती अनाठायी नाही. मुस्लिमांच्या या अनास्थेला ब्राम्हण्यवाद्यांची बहुजन हिंदुंना कायमस्वरुपी बौद्धीक गुलामगिरीत ठेवण्याची धडपड कारणीभूत आहे. या देशात मुस्लिम वाद कायम पेटत ठेवून ते एका दगडात दोन पक्षी मारत आहेत. आपले बहुजनांवरचे नियंत्रण पक्के करित आहेत व मुस्लिमांचे सर्वच बाबतीत खच्चीकरण करित आहेत.
ही परिस्थिती जर बदलायची असेल तर ब्राम्हण्यवाद्यांच्या ताब्यात असलेल्या दोन प्रमुख संस्था आपल्याला काढून घ्याव्या लागतील. त्या म्हणजे देशातील सर्वात महत्वाची गुप्तचर यंत्रणा आय.बी. व जनमत तयार करणारी प्रचार व प्रसार माध्यमे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आय. बी. ब्राम्हण्यवाद्यांनी काबीज केलेली आहे. केंद्र शासनाची सुरक्षाविषयक धोरणे ही आय.बी.च्या सल्ल्याने ठरतात. त्यामूळे ब्राम्हण्यवाद्यांचे अप्रत्यक्षपणे न्यायालयासह सर्वच लोकशाही संस्थांवर नियंत्रण आहे. हीच बाब प्रचार व प्रसार माध्यमांच्या बाबतीत आहे, त्यांच्यावर पण ब्राम्हण्यवादाचे नियंत्रण आहे. अगदी सुरुवातीपासून प्रचार व प्रसार माध्यमांवर ब्राम्हण्यवाद्यांचे नियंत्रण व वर्चस्व आहे. प्रचार व प्रसार माध्यमांचे मालक जरी इतर जातींचे व वार्ताहर जरी बहुजन असले तरी देशातील सर्व प्रमुख माध्यमांचे संपादकीय विभाग आजसुद्धा ९० टक्के ब्राम्हण्यवाद्यांच्या ताब्यात आहेत. त्याद्वारे ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यतच्या राजकीय नेत्यांवर व शासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवू शकतात.
या संस्था तर बहुजनांनी ताब्यात घेणे आवश्यक आहेच. पण ब्राम्हण्यवादी व्यवस्था बदलासाठी सामाजिक चळवळींची ही आवश्यकता आहे. कारण अशा बहुजन चळवळी तयार झाल्या नाहीत असे नाही, पण त्या यशस्वी झाल्या नाहीत. त्यासाठी अनेक कारणे आहेत. सातत्याचा अभाव मर्यादित व्याप्ती व चळवळींच्या नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा ही प्रमुख कारणे आहेत. त्याशिवाय ब्राम्हण्यवाद्यांनी चळवळीत केलेली घुसखोरी हे एक महत्वाचे कारण आहे. स्वत:ला पुरोगामी व धर्मनिरपेक्ष म्हणून घेणार्या ब्राम्हण्यवाद्यांनी परिवर्तनवादी संघटनांत घुसखोरी करुन केली व त्या संघटना हायजॅक केल्या.
त्यांनी नकळत त्या संघटनांना एक परिघ आखून दिला. या संघटनांतील बहुजन नेत्यांना वाटत राहिले की, आपण परिवर्तन चळवळीचे काम करत आहोत, पण प्रत्यक्षात ते ब्राम्हण्यवाद्यांनी आखुन दिलेल्या परिघातच काम करीत होते. काहींना या परिघाची जाणीव होऊन सुद्धा ते बाहेर जाण्याचे धाडस करित नव्हते. कारण बहुतेकांना राजकीय महत्वाकांक्षा होती व आपण मर्यादा ओलांडली तर ब्राम्हण्यवादी प्रचार व प्रसार माध्यमे आपल्याला वाळीत टाकतील अशी त्यांना भीती वाटत होती. ब्राम्हण्यवादी व्यवस्था बदलणे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण प्रसिद्धी, मान, सन्मान, कौतुक, पुरस्कार, राजकीय महत्वाकांक्षा वगैरे यांचा विचार न करता परिघाच्या बाहेर जाऊन कृती करु. ब्राम्हण्यवाद्यांच्या ताब्यात असलेल्या गुप्तचर यंत्रणा व ब्राम्हणी प्रचार व प्रसार माध्यमे ताब्यात घेऊ.
एस.एम.मुश्रीफ
राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षक
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.