‘एफआरपी’चे ४३५ कोटी थकले, ‘शेतकरी आत्महत्यामुक्त’ मुख्यमंत्र्यांचा वादा कागदावरच
मुंबई: राज्याला ‘शेतकरी आत्महत्यामुक्त’ करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. परंतु हा वादा कागदावरच राहिला असून धक्कदायक बाब म्हणजे १ जुलै ते १५ नोव्हेंबर या काळात एक हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. शेतकर्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टीची बाराशे कोटींची भरपाई आणि कारखानदारांकडील ‘एफआरपी’चे ४३५ कोटी रुपये मिळालेले नाहीत. अशा स्थितीत ‘महावितरण’ने ‘एक बिल भरावेच लागेल’ अशी ठाम भूमिका घेतली आहे.
जगाचा पोशिंदा बळीराजा खर्चाच्या तुलनेत शेतमालाला हमीभाव मागतोय, पण तो अजून मिळालेला नाही. दोन वर्षांत राज्यात अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न समोर आला. अनेक शेतकर्यांना उसाचे फड पेटवून द्यावे लागले. आता पीक चांगले आले, पण सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. सरकारने अतिवृष्टीची मदत दुप्पट केली, परंतु सप्टेंबर-ऑक्टोबरमधील मदत मिळालीच नाही. आता जिल्ह्याकडून आलेले प्रस्ताव मंत्र्यांच्या उपसमितीपुढे ठेवले जाणार आहेत. त्यानुसार अधिवेशनात पुरवणी मागणी करून मिळालेली रक्कम शेतकर्यांना वितरीत होईल, असे अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे ऊस कारखान्याला गेल्यापासून १५ दिवसांत शेतकर्यांना एकरकमी एफआरपी द्यावी, असा कायदा आहे. तरीपण, एफआरपीचे ६९० कोटींपैकी केवळ २५५ कोटी रुपयेच शेतकर्यांना मिळाले आहेत.
विभागनिहाय आत्महत्या (जानेवारी ते ऑक्टोबर)
विभाग शेतकरी आत्महत्या
कोकण ०००
अमरावती ९३०
औरंगाबाद ८४६
नाशिक ३१७
नागपूर २८९
पुणे १८
एकूण २,४००
११ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यात यवतमाळ, बीड, अमरावती, बुलढाणा, नांदेड, अकोला, वर्धा, जालना, उस्मानाबाद, जळगाव व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक आत्महत्यांची नोंद मागील साडेदहा महिन्यांत झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २५०, अमरावती जिल्ह्यात २४७, बुलढाण्यात २३५ आणि बीड जिल्ह्यातील २३१ शेतकर्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे.
वीज तोडणी थांबली, पण एक बिलाची अट
राज्याला लागणार्या एकूण वीजेतील ३०.९८ टक्के वीज शेतीसाठी लागते. अतिवृष्टीने खरीप पिके वाया गेल्यानंतर रब्बीची पेरणी, पिकांच लागवड आता युद्धपातळीवर सुरु आहे. अशावेळी शेतकर्यांकडील वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. त्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यावर कनेक्शन तोडणी थांबली. परंतु, आता दोन बिलांऐवजी चालू एक बिल भरावेच लागेल, अशी भूमिका ‘महावितरण’ अधिकार्यांनी घेतली आहे.
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.