१३१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा दावा फोल
नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राचा दावा केला होता, मात्र हा दावा फोल ठरला असून जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात नागपूर विभागात एकूण २८९ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी १३१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने शेतकरी कुटुंबीय मदतीपासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शेतकरी आत्महत्त्येपैकी मदतीसाठी पात्र ठरणार्या प्रकरणांची संख्या तुलनेने खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे. नागपूर विभागात झालेल्या २८९ आत्महत्येपैकी फक्त ९५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहे. नागपूर जिल्ह्यातील ५३ प्रकरणांपैकी १६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. ७ अपात्र ठरली असून ३० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती अहवालात नमुद करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील १२८ प्रकरणांपैकी ४१ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. ३६ अपात्र ठरली असून ५१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.
भंडारा जिल्ह्यातील २० प्रकरणांपैकी ०६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. १२ अपात्र ठरली असून २ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे. गोंदिया जिल्ह्यातील ०५ प्रकरणांपैकी ०३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. २ अपात्र ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ८३ प्रकरणांपैकी २९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. ०६ अपात्र ठरली असून ४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या ११ महिन्यात राज्यात सुमारे २ हजार ४९८ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. केलेली प्रत्येक मदत शेतकर्यांपर्यत पोहोचल्याचा अधिकार्यांचा दावा यामुळे फोल ठरला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेनंतरही राज्यात शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने पीक पद्धतीत बदल करण्याची मागणी समोर येत आहे.
सरकारतर्फे शेतकर्यांसाठी वीज बिल माफीपासून विविध कर्जमाफी तसेच सवलत योजनांची अंमलबजावणी केली जाते. योजनेचे लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचल्याचे दावे यंत्रणांकडून केले जातात. ते किती फोल आहेत हे या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. २०२० मध्ये राज्यात २ हजार ५४७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भ हा शेतकरी आत्महत्यांसाठीच ओळखला जातो. त्यातही यवतमाळ २७० व अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ३३१ शेतकरी आत्महत्या झाल्या.
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.