प्रबुद्ध भारताचा हिंदुस्थान बनविण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशात हर घर तिरंगा, समूह राष्ट्रगीत स्पर्धा नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यास भाग पाडले गेले. ज्यांनी ७५ वर्षात राष्ट्र ध्वजाबाबत नफरत पेरली. त्याच लोकांनी हर घर घर तिरंगा अभियान शासनाची प्रशासकीय यंत्रणा वापरून गोरख धंदा केला.
प्रबुद्ध भारताचा हिंदुस्थान बनविण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशात हर घर तिरंगा, समूह राष्ट्रगीत स्पर्धा नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यास भाग पाडले गेले. ज्यांनी ७५ वर्षात राष्ट्र ध्वजाबाबत नफरत पेरली. त्याच लोकांनी हर घर घर तिरंगा अभियान शासनाची प्रशासकीय यंत्रणा वापरून गोरख धंदा केला. त्यामुळे त्यात देशभक्ती कमी आणि धंदा जास्त झाला.
महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण आरोग्याच्या खासगीकारणामुळे नागरिकात प्रचंड असंतोष, अस्वस्थता आहे. आता जम्मू काश्मीरचे ३७० व ३५ ए कलमामुळे सर्व गंभीर प्रश्न मागे पडले आहेत. राम मंदिर शिला पूजनमुळे सर्व संकट दूर झालीत. राम मंदिर, ईव्हीएम मशीनबाबत निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट निर्भीड,निःपक्षपाती निर्णय घेतांना दिसले नाही. प्रशासकीय यंत्रणा कुठेही प्रामाणिकपणे संविधानाच्या चौकटीत कार्यरत दिसत नाही. एका बाजूला आपल्याला स्वातंत्र्य आहे.
तर दुसर्या बाजूला प्रचंड विषमतावादी समाज व्यवस्था जे सांगते ते मान्य करा नाहीतर भर चौकात दहावीस लोक मॉब लिंचिंग स्मार्टफोन मोबाईलवर व्हिडीओ करून आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून देत आहेत.त्यांना कोणाची भीती वाटत नाही. त्यामुळेच हजारो प्रश्न उभे राहतात. आपण व आपला देश खरोखरच स्वातंत्र्य झाला आहे काय? की गोरे गेले आणि काळे शेंडीवाले आले.
१५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वीचे दिवस आता २०२२ नंतरच्या दिवसात किती फरक पडला? तरी स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव घरा घरात सक्तीने साजरा केला गेला. आज देशातील खेड्यापाड्यात शेतकरी शेतमजुरांच्या हाती महागडा स्मार्टफोन मोबाईल आहे. पण त्याला चार्जिंग करण्यासाठी चोवीस तास वीज नाही. तरी दोन वर्ष ऑन लाईन शिक्षण घेतले आहे.
मोठ्यांना मोठं मोठी घरे आहेत,गरिबांना इंदिरा निवास,रमाई निवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेची पक्की घरे आहेत, तरी चारहीबाजूने पावसाच्या पाण्यात रस्ते,कुठे आहेत दिसत नाही.देशात अनेक राज्यात पावसाच्या पाण्यामुळे पूरजन्य परिस्थिती आहे.लॉक डाऊनमुळे उद्योग धंदे बंद असल्यामुळे बेरोजगारी उपासमारीचे संकट कोरोनापेक्षा जास्त प्रमाणात आहे. जगावर राज्य करण्यासाठी रामरक्षा,हनुमान चालीसा,लक्ष्मण रेषा जगाच्या सर्व भाषेत इंग्रजी सह मनुस्मृती तत्वज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भारत माझा देश आहे.सर्व भारतीय माझे बांधव आहेत. सर्वांशी मी गुण्यागोविंदाने वागेल ही प्राथमिक,माध्यमिक शाळा कॉलेजमध्ये शिकवली जाणारी प्रतिज्ञा शाळा कॉलेजच्या आत बाहेर आचरणात आणण्याची आवश्यकता राहणार नाही. हेच विद्यार्थी जेव्हा उच्चशिक्षित होऊन अधिकारी कर्मचारी बनतात तेव्हा आर्टिकल १५ कलमाचे खुलेआम उल्लंघन करतांना दिसतात.
नैसर्गिक संकटात भारतीय नागरिकांत ती कधी कधीच दिसते ती म्हणजे माणुसकी. पूरग्रस्त भागात तीच माणुसकी कामाला येतांना दिसत आहे. म्हणून खूप माणसांची जीवित हानी टळली. पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे गेल्या काही दिवसात प्रचंड हाहाकार उडाला आहे. पुरात अडकलेल्या लोकांना सुखरूप काढण्याचे काम लष्करांचे जवान, नौदल, आणि एनडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
कोरोनामुळे नवसाला पावणारे जागृत देव व देवी स्वतःच्या घरांना वाचवू शकले नाही.ते कुलूप बंद करून शांत बसले होते.पण तेच गणवेशातील पोलीस, सुरक्षा दले, सैन्य आणि डॉक्टर,नर्स,पालिका कामगार,कर्मचारी तुमच्या आमच्या सारखेच माणसेच धावून आलीत.त्यामुळे जाती धर्माचा गर्व करण्यापेक्षा माणुसकीचा गर्व करा.असा भारतीय संविधानाने दिलेला संदेश आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवला पाहिजे. भारत माझा देश आहे व सगळे भारतीय माझे बांधव हीच भावना नेहमी मनात असायला पाहिजे. ती घरात दारात किंवा कार्यालयात आचरणात दिसली पाहिजे.
भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगू शकत नाही. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून लोकप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते. जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका, प्रशासकीय यंत्रणा, कार्यकारी मंडळ, अधिकारी वर्ग, विधिमंडळ म्हणजे संसद,विधानसभा, प्रसार मध्यमे.
या आज तरी पूर्णपणे कोसळलेल्या दिसतात. आज स्वातंत्र्य म्हणजे काय? आजच्या पिढीला विचारले तर खा पिया मजा करा फुल एन्जॉय करा कोणीच कोणाला विचारू शकत नाही, हेच खरे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच आजची मुलंमुली आईवडील,काका,मामा यांचा आदरयुक्त आदर्श ठेवतांना दिसत नाही. कोणालाच कोणाचे बंधन नाही. कोणी कसे ही सैराट वागू देण्याची परवानगी म्हणजे स्वातंत्र्य आहे.
कुटुंबातील एकत्र राहण्याची एकमेकांना आधार देणारी एकत्रित कुटुंब पद्धत पूर्णपणे मोडून पडली,जसे कुटुंबातील सर्व सभासद वेगवेगळ्या पद्धतीने आपले जीवन जगतात. तशीच पध्दत नगरानगरात, वॉर्डात, तालुक्यात होत आहे. त्यामुळे कुटुंबात एकमत नाही. चारभाऊ चार पक्षात आणि आईवडील वृध्दाश्रमात म्हणे सर्वांना स्वातंत्र्य मिळाले आहे. हीच परिस्थिती देशाची झाली आहे.
राजकीय पक्षांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. ते जे ७५ वर्षात झाले नाही ते त्यांनी सात,आठ वर्षात पूर्ण सत्ता प्रस्थापित केल्यानंतर करून दाखविले. त्यामुळेच अनेक प्रामाणिक कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने सेवा करण्यास नकार दिला व घरी बसणे पसंत केले.
या देशातील न्यायाधीशांना पत्रकार परिषदेत आपले दुःख व्यक्त करावे लागते. त्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही तर आत्महत्या, अपघात किंवा हृदय विकाराचा तीव्र वेदनामुळे मृत्यू अटळ आहे. तर सर्व सामान्य असंघटित कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना,कामगारांना किती अन्याय,अत्याचार सहन करावे लागत असतील यांचा विचार करावा लागणार आहे.
आरक्षणामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगणारी प्रभावशाली यंत्रणा विचारधारा या देशात आहे. एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे गुणवत्ता मोजणारी यंत्रणा व माणसं सर्व मोक्याच्या ठिकाणी बसली असतांना आरक्षण घेणार्यामुळे देशाचे वाटोळे कसे झाले? विषमतावादी विचारधारा मानणारे अधिकारी,कर्मचारी निर्णय घेणारी यंत्रणा यांची असतांना मुलभूत समस्यावर याची साधी चर्चा केली जात नाही.
माझ्या मुलांचा, मुलींचा त्यांचा दुसरीत शिकणारा मुलगा विचारतो स्वातंत्र्य दिन का साजरा करतात? झेंडा वंदन करावे आणि चॉकलेट खावे, सार्वजनिक सुट्टीचा आनंद घ्यावा,चाळीत सोसायटीच्या आवारात सत्यनारायण महापूजा ठेवावी. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात. झाला स्वातंत्र्य दिन? स्वातंत्र्य संग्रामावर चार शब्द बोलले पाहिजे. हा संग्राम कोणा विरोधात का करावा लागला हा इतिहास सांगितला नाही तर पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिन का साजरा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.