ओबीसीच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी आज संघटीत होणे गरजेचे आहे. ओबीसी समाजातील पत्रकार,साहित्यिक,विचारवंतानी ओबीसी आरक्षण,ओबीसी जनगणना,सत्तेतील राजकीय हिस्सेदारीसाठी समाजात जाऊन प्रबोधन करणे गरजेचे आहे.
ओबीसीच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी आज संघटीत होणे गरजेचे आहे. ओबीसी समाजातील पत्रकार,साहित्यिक,विचारवंतानी ओबीसी आरक्षण,ओबीसी जनगणना,सत्तेतील राजकीय हिस्सेदारीसाठी समाजात जाऊन प्रबोधन करणे गरजेचे आहे. ओबीसीकडे संपत्ती असेल आणि ज्ञान नसेल तर संपती काय कामाची? भारतीय संविधान पाहिले नसेल तर वाचणार कधी? म्हणूनच ओबीसी समाजात संविधान विषयी जनजागृती करणे अतिशय आवश्यकता आहे.
ओबीसी समाजात ज्या गोष्टींची गरज आहे त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि वधू वर सूचक मेळाव्यावर जास्त भर दिला जातो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला,क्रिडा कार्यक्रमाचे आयोजन केल्यास ओबीसी समाजातील तरुणाच्या कलाकौशल गुणवंता बाहेर काढण्यास संधी मिळेल.त्यामुळेच ओळख नसलेला ओबीसी तरुण समाजात ओळख निर्माण करेल.त्यातून वधू वर संशोधनाची मोठी समस्या सुटू शकते.ओबीसी समाजात इतर छोटेमोठे कार्यक्रम समाजात आयोजित केले जातात.
त्यांचा राजकीय पक्षांना फायदा होतो.त्यातून कार्यकर्ता कार्यकर्ताच राहतो.तो ओबीसी समाजाचा नेता होऊ शकत आणि पक्षाचा पण नेता होऊ दिला जात नाही. प्रत्येक पक्षातील ओबीसी नेत्यांची यादी काढा त्यांच्या जातीत त्यांना किती मानले जाते ते तपासून पहा. ज्याला स्वत:च्या जातीत किंमत नाही त्याला ओबीसी नेता म्हणून मोठे केले जाते. म्हणूनच ओबीसी समाजाने हे समजून घेऊन बदलणे गरजेचे आहे. आता आज ओबीसीच्या कार्यकर्ता, नेता, पत्रकार, साहित्यिक, विचारवंतानी स्वत:ला बदलून घेतले नाही तर ओबीसीच्या भावी पिढीचे मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.
राज्यात आणि देशात ओबीसी समाजातील विविध ओबीसी संघटना ओबीसी नेते, ओबीसी समाजात जनजागृती अभियान राबवित आहेत. असे असताना ओबीसी समाजाच्या संघटना,संस्था आणि जबाबदार पदाधिकारी,नेतेमंडळी वैचारिकदृष्ट्या दिशाहीन अवस्थेत वावरत आहेत.त्यांच्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध पातळीवर कार्यरत पदाधिकारी मात्र ओबीसी बद्दल कोणताही ठोस कृती कार्यक्रम नसल्यामुळे गप्प बसून आहेत. त्यांच्या या वागण्यामुळे ओबीसीच्या येणार्या भावी तरुण पिढीचे नुकसान होईल. ओबीसी समाजाची ५२ टक्के संख्या असतांना त्यांना कोणत्याही पक्षात मान्यताप्राप्त पद व निर्णय प्रक्रियेत स्थान नाही. आज नाही तर भविष्यात काय स्थान असेल.
ओबीसी समाजातील आजच्या पिढीला संविधान माहिती नसेल तर भावी पिढीला ते कोण सांगणार आहे.ओबीसी आरक्षण,जनगणना,राजकीय आरक्षण याबाबत कोणाचीच ठोस भूमिका नाही. सत्तेत सहभाग नाही, त्याबाबतचे ज्ञान नाही. त्यासाठी समाजात संघटना, संस्था पाहिजेत. संबंधित असलेले सर्वंच पदाधिकारी आणि स्वतःला समाज नेते म्हणवून घेणार्या अशा सर्वच समाज मान्यवरांनी समाजात ओबीसी बद्दल आणि इतर विषयावर प्रबोधन,जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचा आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
ओबीसी समाजात जागृतीचा मोठा अभाव जाणवतो, याबद्दल समाजात जबाबदारीने सांगण्यास कोणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. त्यामुळे समाजात चुकीची माहिती पसरवली जाते. वास्तविक पाहता समाजात अनेक जबाबदार मान्यताप्राप्त व्यक्ती आहेत त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी समाज जनजागृती वैचारिक प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु असे होतांना दिसत नाहीत.
ओबीसींमध्ये स्वत:ची कोणतीही विचारधारा नसेल तर ते वर्ण व्यवस्थेनुसार श्रद्धा,सबुरीने गुलामगिरीचं स्वीकारतील. पूर्व जन्माचे पाप आहे हे कुणालाच चुकले नाही हे त्यांच्या मेंदूत कायम राहणार आहे. ओबीसी समाज आजही कर्मकांड,धार्मिकता,काल्पनिक गोष्टींचा प्रचार व प्रसार करतांना दिसतो समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकार केल्याशिवाय समाजात प्रगती होणार नाही याकडे समाजातील जबाबदार असणारे पदाधिकारी परखडपणे भाष्य करीत नाहीत. पर्यायाने समाजात अंधश्रद्धा आणि धार्मिकता बळावत जात आहे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन मागे पडत आहे हे कोणाच्याही लक्षात कसे येत नाही.
समाजात सुशिक्षित वर्गाचे प्रमाण जास्त आहे तरी सुद्धा समाजात अंधश्रद्धा आणि धार्मिकता दूर करण्यास अपयश का येते हा चिंतनाचा विषय आहे. एकीकडे ओबीसी म्हणून संवैधानिक दृष्टीने सर्वंच हक्क अधिकार मिळवायचे आणि दुसरीकडे ओबीसी बद्दल समाज प्रबोधनात्मक दृष्टीने मागे राहायचे असे दुटप्पी धोरणाचा अवलंब करायचा, यामुळे समाजात वैचारिक आणि सामाजिक परिवर्तन होणार नाही.
ओबीसीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक दृष्टीने अधिकार हक्काची जाणिव करून दिलेली असतांना त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे यासाठी लढा उभारला पाहिजे. आजची तरूण पिढी उद्याचे भविष्य आहे. असे केवळ बोलून चालणार नाही.तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन आणि पर्याय दिला पाहिजे. तो मिळाला नाही तर तरूण पिढीचे भविष्यात वैचारिक नुकसान होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणूनच भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी गरजेचे आहे. गांभीर्याने विचार करा,एकत्र बसून चर्चा करा, संवाद साधा विचारांची देवाण घेवाण करा शंभर टक्के मार्ग निघतो.
प्रमोद सूर्यवंशी
८६०५५६९५२१
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.