आरएसएसचे भैय्याजी जोशी यांनी नाक खुपसले, शेतकर्यांना डिवचण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली: आपल्या हक्क व अधिकारासाठी झगडणार्या शेतकर्यांना नको तो फुकटचा सल्ला देऊन त्यांच्या आंदोलनात नाक खुपसण्याचा प्रयत्न आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांनी केला आहे. इतके दिवस शेतकर्यांचे आंदोलन समाजासाठी चांगले नाही असे सांगत त्यांनी शेतकर्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मग समाजासाठी काय आहे हे जोशी यांनी सांगायला हवे. शेतकर्यांना पर्यायाने लोकांना गुलाम बनवण्याचे आरएसएसच्या लोकांचे षड्यंत्र असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. इंडियन एक्सप्रेसने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात कृषी कायद्यांबाबतचा प्रश्न सुटत नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर सरकारही अडेलतट्टूपणा करत आहे. वादाचे निराकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मध्यम मार्ग शोेधावा लागेल. आंदोलन लवकर संपवावे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आंदोलकांना संभाषणातून जे काही मिळत ते त्यांनी स्वीकारायला हवे अशी मखलाशी जोशी यांनी केली. सरकारने आणखी काय देऊ शकते याचा विचारही केला पाहिजे. हालचाली सतत होत असतात. त्यामुळे कोणत्याही चळवळीने आपले स्थान पहावे, सरकारनेही त्याचे स्थान निश्चित केले पाहिजे.
या आंदोलनाचा संबंधित लोकांवर कधीही परिणाम होत नाही, तर त्याचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे समाजावर परिणाम होतो. समाजावर परिणाम होतो तर शेतकर्यांना न विचारता कायदे का लादण्यात आले याचा जोशी यांनी उत्तर द्यायला हवे. या कायद्यांमागे तुमचीच आरएसएस संघटना हे कळायला शेतकरी काही दुधखुळे नाहीत अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. खलिस्तानी आणि माओवाद्यांच्या मुद्यावर जोशी यांनी छेडले असता काही लोक असे म्हणतात परंतु सरकारने असे काहीही बोललेले नाही असे सांगत त्यांनी हात वर केले. काही लोकांना तोडगा नको आहे, असा कांगावा जोशी यांनी केला. शेतकरी आंदोलनाला सार्या देशात समर्थन मिळत असताना कुठल्याही राज्यात समर्थन मिळत नसल्याची खोटी माहिती जोशी यांनी दिली.
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.